म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
'शिवसेनेकडून सरकार स्थापनेसंदर्भात कोणताही प्रस्ताव आम्हाला मिळाला नाही. अधिकृत प्रस्ताव आला तर त्याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू,' अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी मांडली.
'विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि राज्यातील जनतेने आपला कौल दिला आहे. या निकालातून जनतेने भाजपचा सत्तेचा अहंकार उतरवला आहे. भाजपच्या नेत्यांना जनतेने जमिनीवर आणल्याने त्यांना आता विरोधकही दिसतील,' असा टोला थोरात यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, 'भाजपने सत्ता, पैसा आणि यंत्रणांचा गैरवापर करून विरोधीपक्षांच्या नेत्यांना पक्षांतर करायला लावले. पण जनतेने या सर्व 'आयाराम गयारामां'चा पराभव करून भाजपच्या सत्तेच्या मग्रुरीला चाप लावला आहे. 'महाराष्ट्राच्या जनतेला गृहित धरू नका, उतू नका, मातू नका' हा संदेश जनतेने या निकालातून दिला आहे.'
या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीने चांगले यश मिळवले आहे. काँग्रेस - ४४, राष्ट्रवादी काँग्रेस - ५४, बहुजन विकास आघाडी - ३, समाजवादी पक्ष - २, शेतकरी कामगार पक्ष - १, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष - १, स्वाभिमानी शेतकरी संघटना - १, रवी राणा - १ आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष - १० असे मिळूण जवळपास ११७ उमेदवार निवडून आले आहेत. विरोधीपक्ष पूर्वीपेक्षा ताकदवान झालेला आहे. विरोधीपक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड कष्ट घेतले. आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही, असेही त्यांनी सांगितले.
'राहुल गांधी यांनी राज्यात पाच सभा घेतल्या. मी स्वतः, मल्लिकार्जुन खर्गे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधीया, शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी नेत्यांनी अनेक सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभराच जोरदार प्रचार केला, त्यांच्या अनुभवाचा आम्हालाही फायदा झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणले. आगामी काळात राज्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांसाठी आम्ही ताकदीने लढू. आमच्या १९ जागा १० हजार पेक्षा कमी मताने हारल्या आहेत. मुंबईसह शहरी भागात अपेक्षित यश मिळाले नाही. तिथे आम्ही जास्त प्रयत्न करू, संघटन मजबूत करू, पाच वर्षात नवी काँग्रेस उभी करू,' असेही ते म्हणाले.
'त्या' वाहिन्यांविरोधात घेणार कायदेशीर सल्ला
काही वृत्तवाहिन्यांनी निवडणुकीआधीच ओपिनियन पोल दाखवून 'आघाडीचे पानीपत होणार', असे सांगितले. तर काही वाहिन्यांनी मी, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण पडणार असल्याच्या बातम्या मतदानानंतर दाखवल्या. आम्ही सगळे ५० हजार ते एक लाखांच्या फरकाने निवडणुका जिंकलो आहोत. या वृत्तवाहिन्या वा त्यांच्यासाठी सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कायदेशीर सल्ला घेण्याचा विचार करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'शिवसेनेकडून सरकार स्थापनेसंदर्भात कोणताही प्रस्ताव आम्हाला मिळाला नाही. अधिकृत प्रस्ताव आला तर त्याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू,' अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी मांडली.
'विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि राज्यातील जनतेने आपला कौल दिला आहे. या निकालातून जनतेने भाजपचा सत्तेचा अहंकार उतरवला आहे. भाजपच्या नेत्यांना जनतेने जमिनीवर आणल्याने त्यांना आता विरोधकही दिसतील,' असा टोला थोरात यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, 'भाजपने सत्ता, पैसा आणि यंत्रणांचा गैरवापर करून विरोधीपक्षांच्या नेत्यांना पक्षांतर करायला लावले. पण जनतेने या सर्व 'आयाराम गयारामां'चा पराभव करून भाजपच्या सत्तेच्या मग्रुरीला चाप लावला आहे. 'महाराष्ट्राच्या जनतेला गृहित धरू नका, उतू नका, मातू नका' हा संदेश जनतेने या निकालातून दिला आहे.'
या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीने चांगले यश मिळवले आहे. काँग्रेस - ४४, राष्ट्रवादी काँग्रेस - ५४, बहुजन विकास आघाडी - ३, समाजवादी पक्ष - २, शेतकरी कामगार पक्ष - १, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष - १, स्वाभिमानी शेतकरी संघटना - १, रवी राणा - १ आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष - १० असे मिळूण जवळपास ११७ उमेदवार निवडून आले आहेत. विरोधीपक्ष पूर्वीपेक्षा ताकदवान झालेला आहे. विरोधीपक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड कष्ट घेतले. आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही, असेही त्यांनी सांगितले.
'राहुल गांधी यांनी राज्यात पाच सभा घेतल्या. मी स्वतः, मल्लिकार्जुन खर्गे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधीया, शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी नेत्यांनी अनेक सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभराच जोरदार प्रचार केला, त्यांच्या अनुभवाचा आम्हालाही फायदा झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणले. आगामी काळात राज्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांसाठी आम्ही ताकदीने लढू. आमच्या १९ जागा १० हजार पेक्षा कमी मताने हारल्या आहेत. मुंबईसह शहरी भागात अपेक्षित यश मिळाले नाही. तिथे आम्ही जास्त प्रयत्न करू, संघटन मजबूत करू, पाच वर्षात नवी काँग्रेस उभी करू,' असेही ते म्हणाले.
'त्या' वाहिन्यांविरोधात घेणार कायदेशीर सल्ला
काही वृत्तवाहिन्यांनी निवडणुकीआधीच ओपिनियन पोल दाखवून 'आघाडीचे पानीपत होणार', असे सांगितले. तर काही वाहिन्यांनी मी, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण पडणार असल्याच्या बातम्या मतदानानंतर दाखवल्या. आम्ही सगळे ५० हजार ते एक लाखांच्या फरकाने निवडणुका जिंकलो आहोत. या वृत्तवाहिन्या वा त्यांच्यासाठी सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कायदेशीर सल्ला घेण्याचा विचार करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.