अ‍ॅपशहर

दहावीची पुस्तके एप्रिलमध्येच येणार

आगामी शैक्षणिक वर्षात दहावीचा अभ्यासक्रम बदलणार असून एप्रिलमध्येच विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके येणार आहेत. नववीचा अभ्यासक्रम मागील वर्षी बदलला त्यावेळी पुस्तके यायला उशीर झाला होता.

Maharashtra Times 23 Jan 2018, 5:36 am

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्र टाइम्स.कॉम book


आगामी शैक्षणिक वर्षात दहावीचा अभ्यासक्रम बदलणार असून एप्रिलमध्येच विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके येणार आहेत. नववीचा अभ्यासक्रम मागील वर्षी बदलला त्यावेळी पुस्तके यायला उशीर झाला होता. यंदा दहावीचा अभ्यसक्रम बदलताना त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी मंत्रालयातील संबंधित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेतली. संबंधितांनी पुस्तके एप्रिलमध्येच उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांना सांगितले.

मुंबईतील अनेक शाळा नववीच्या परीक्षा मार्चमध्ये घेऊन लगेच निकाल घोषित करून एप्रिलमध्ये दहावीचे वर्ग सुरू करतात. बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच मागील वर्षी नववीची पाठ्यपुस्तके बाजारात यायला जुलै उजाडल्याने त्याची पुनरावृत्ती टाळणे आवश्यक आहे. दहावीच्या मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी एप्रिलमध्येच पुस्तके देण्याची अनिल बोरनारे यांची मागणी करण्यात आली. यावेळी त्यांच्यासमवेत परिषदेचे सुभाष अंभोरे, मुंबई मराठी अध्यापक संघाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भारती, ज्ञानेश्वर खंबायत उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज