अ‍ॅपशहर

मुंबईत मतदार यादीतील ११ लाख नावे गायब?

मुंबईत २०१२ या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीतील मतदार यादीमधील तब्बल ११ लाख मतदारांची नावे यावर्षीच्या मतदार यादीतून गायब झाली आहेत. या माहितीनुसार नव्या मतदार यादीत मोठा घोळ झाला असल्याची शंका व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर लाखो लोकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले असल्याचे स्पष्ट होत आहे.

Maharashtra Times 21 Feb 2017, 8:46 pm
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 lacs voters names missing from voter list in mumbai
मुंबईत मतदार यादीतील ११ लाख नावे गायब?


मुंबईत २०१२ या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीतील मतदार यादीमधील तब्बल ११ लाख मतदारांची नावे यावर्षीच्या मतदार यादीतून गायब झाली आहेत. या माहितीनुसार नव्या मतदार यादीत मोठा घोळ झाला असल्याची शंका व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर लाखो लोकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले असल्याचे स्पष्ट होत आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर मतदार याद्या अद्ययावत केल्यानंतर ११ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. यात काही मतदार मृत्यू पावल्यामुळे तर काही मतदार मुंबईबाहेर गेल्यामुळे ही नावे गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील अनेक ठिकाणी आपली नावे गायब असल्याने मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेषत: मालाड, बोरीवली, वरळी आणि घाटकोपरमधील मतदारसंघांमध्ये अशा मतदारांची संख्या अधिक होती. यापैकी अनेक मतदारांनी गेल्या विधानसभा निवडणुकीला मतदान केले होते. परंतु, यावेळी मात्र मतदार यादीत नाव नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज