मुंबई: करोनाच्या भीतीने घरात थांबावं लागलेल्या राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. करोनाची लागण झालेले रुग्ण बरे होत असून आतापर्यंत १५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
आज मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या १२४वर गेली आहे. राज्यात रोज करोनाचे रुग्ण आढळत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. आजापर्यंत १५ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
'करोनामुक्तीनंतरच रेडीरेकनरचे दर जाहीर करू'
दरम्यान, राज्यात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी घरातच राहणं पसंत केलं आहे. अपवाद वगळता काही ठिकाणी लोक रस्त्यावर आले होते. मात्र, पोलिसांच्या लाठीचा प्रसाद बसल्याने त्यांनाही घरी थांबावं लागलं आहे. नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये आणि दुकानात विनाकारण गर्दी करू नये याकडे पोलिसांचं लक्ष आहे. ठिकठिकाणी पोलिसांच्या गस्ती सुरू असून रस्त्यावर येणाऱ्यांना हुसकावून लावलं जात आहे.
नवी मुंबई: वाशी येथे महिलेचा करोनामुळं मृत्यू?
आज मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या १२४वर गेली आहे. राज्यात रोज करोनाचे रुग्ण आढळत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. आजापर्यंत १५ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
लष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका: अजित पवार
करोनामुळे बरे झालेल्यांमध्ये पुण्यातील दोन दाम्पत्यांसह मुंबई आणि औरंगाबादमधील रुग्णांचाही समावेश असल्याचं टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, राज्यात मुंबई शहर आणि उपनगर ५२, पिंपरी चिंचवड मनपा १२, पुणे मनपा १९, नवी मुंबई ५, कल्याण ५, नागपूर ४, यवतमाळ ४, सांगली ९, अहमदनगर ३, ठाणे ४, सातारा २ आणि पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई-विरारमध्ये प्रत्येकी एक करोना रुग्ण आढळला आहे. तर राज्यातील करोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या चारवर पोहोचली आहे.'करोनामुक्तीनंतरच रेडीरेकनरचे दर जाहीर करू'
दरम्यान, राज्यात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी घरातच राहणं पसंत केलं आहे. अपवाद वगळता काही ठिकाणी लोक रस्त्यावर आले होते. मात्र, पोलिसांच्या लाठीचा प्रसाद बसल्याने त्यांनाही घरी थांबावं लागलं आहे. नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये आणि दुकानात विनाकारण गर्दी करू नये याकडे पोलिसांचं लक्ष आहे. ठिकठिकाणी पोलिसांच्या गस्ती सुरू असून रस्त्यावर येणाऱ्यांना हुसकावून लावलं जात आहे.
नवी मुंबई: वाशी येथे महिलेचा करोनामुळं मृत्यू?