देशातील सर्वाधिक वेगाने शहरीकरण होणारे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील छोट्या व मोठ्या शहरांसाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी १६०० कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. अलिकडेच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायती निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश प्राप्त झाले असून त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी व ‘ड’ वर्ग महापालिकांच्या पायाभूत सुविधांसाठी ११०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागरी क्षेत्रातील पाणीपुरवठा व मलनि:सारण व नागरी परिवहन सांडपाण्याचा पुनर्वापर, हरितपट्टे या मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या अटल मिशन फॉर रिज्युवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) या योजनेसाठी १८७० कोटींची तरतूद आहे.
स्मार्ट सिटींसाठी १६०० कोटी
स्मार्ट सिटी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी १६०० कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
Maharashtra Times 19 Mar 2017, 2:03 am