अ‍ॅपशहर

कर्जमाफीसाठी २० हजार कोटींचे कर्ज

राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी २० हजार कोटी रुपयांच्या कर्जाची उभारणी करण्यास केंद्र सरकारने राज्य सरकारला परवानगी दिली आहे. २० हजार कोटी रुपयांचे कर्ज राज्य सरकारने काढल्यानंतर राज्यावरील कर्जाचा बोजा साडेचार लाख कोटी रुपयांवर जाणार आहे.राज्य सरकारने ८९ लाख शेतकऱ्यांचे ३४ हजार २२ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे.

Maharashtra Times 19 Sep 2017, 3:23 am
केंद्राची राज्य सरकारला परवानगी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 thousands loan for loan waivers
कर्जमाफीसाठी २० हजार कोटींचे कर्ज

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी २० हजार कोटी रुपयांच्या कर्जाची उभारणी करण्यास केंद्र सरकारने राज्य सरकारला परवानगी दिली आहे. २० हजार कोटी रुपयांचे कर्ज राज्य सरकारने काढल्यानंतर राज्यावरील कर्जाचा बोजा साडेचार लाख कोटी रुपयांवर जाणार आहे.

राज्य सरकारने ८९ लाख शेतकऱ्यांचे ३४ हजार २२ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने कर्जमाफीसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने राज्य सरकारने विकास योजनांना कात्री लावली आहे. केंद्र सरकारने चालू सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यास मंजुरी दिली आहे. परंतु, सरकारने एप्रिल ते जून २०१७ या तीन महिन्यांच्या कालावधीत वेतन, भत्ते आदी आस्थापन खर्चासाठी १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी आणखी २० हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती.

केंद्राने शेतकरी कर्जमाफीसाठी २० हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यास मान्यता दिल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. केंद्राने कर्जमाफीसाठी कर्ज काढण्यासाठी परवानगी दिल्यामुळे कर्जमाफी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच २ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज