मुंबई
कोकणच्या चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी त्यांना कोकणातील गावी सुखरूप जाता यावे यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या २२२५ जादा बस सोडण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली आहे. सुखरुप प्रवासाच्या दृष्टीने कोकणातील नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही रावते यांनी केले आहे.
संगणकीय आरक्षण सुविधा ९ ऑगस्ट पासून
या वर्षी लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आपल्या इतर विभागाकडून २२२५ बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या ९ ऑगस्ट (एक महिना अगोदर) पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत.
१ ऑगस्ट पासून ग्रुप बुकिंगला सुरुवात.
याबरोबरच ग्रुप बुकिंगला (संघटित आरक्षण) १ ऑगस्टपासून सुरवात करण्यात येत असल्याचेही एसटी महामंडळाने जाहीर केले आहे. या ग्रुप बुकिंगसाठी संबंधितांना प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावाच्या यादीसह आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा लागणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना अधिक सुविधा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ८ सप्टेंबर २०१८ ते १२ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ८ ते ९ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बसस्थानके, तसेच बसथांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत असे एसटी महामंडळाने जाहीर केले आहे. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी 'वाहन दुरुस्ती पथक ' (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याचेही महामंडळाने म्हटले आहे.
कोकणातील सावंतवाडी, मालवण,कणकवली,देवगड, विजयदुर्ग, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, श्रीवर्धन, पेण, अलिबाग तसेच आजूबाजूच्या परिसरात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांनी सुरक्षित प्रवासासाठी आपल्या प्रवासाची तारीख आणि वेळ ठरवून संबंधित आगारांशी संपर्क साधावा, एसटी बसेसचे आरक्षण करावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फ़े करण्यात आले आहे.
कोकणच्या चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी त्यांना कोकणातील गावी सुखरूप जाता यावे यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या २२२५ जादा बस सोडण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली आहे. सुखरुप प्रवासाच्या दृष्टीने कोकणातील नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही रावते यांनी केले आहे.
संगणकीय आरक्षण सुविधा ९ ऑगस्ट पासून
या वर्षी लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आपल्या इतर विभागाकडून २२२५ बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या ९ ऑगस्ट (एक महिना अगोदर) पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत.
१ ऑगस्ट पासून ग्रुप बुकिंगला सुरुवात.
याबरोबरच ग्रुप बुकिंगला (संघटित आरक्षण) १ ऑगस्टपासून सुरवात करण्यात येत असल्याचेही एसटी महामंडळाने जाहीर केले आहे. या ग्रुप बुकिंगसाठी संबंधितांना प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावाच्या यादीसह आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा लागणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना अधिक सुविधा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ८ सप्टेंबर २०१८ ते १२ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ८ ते ९ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बसस्थानके, तसेच बसथांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत असे एसटी महामंडळाने जाहीर केले आहे. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी 'वाहन दुरुस्ती पथक ' (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याचेही महामंडळाने म्हटले आहे.
कोकणातील सावंतवाडी, मालवण,कणकवली,देवगड, विजयदुर्ग, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, श्रीवर्धन, पेण, अलिबाग तसेच आजूबाजूच्या परिसरात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांनी सुरक्षित प्रवासासाठी आपल्या प्रवासाची तारीख आणि वेळ ठरवून संबंधित आगारांशी संपर्क साधावा, एसटी बसेसचे आरक्षण करावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फ़े करण्यात आले आहे.