मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या पक्ष त्यागामुळं मुंबई काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे. मुंबई काँग्रेसमध्ये दबदबा असलेल्या कामत यांच्यासाठी पक्षाचे तब्बल २५ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या घडामोडी काँग्रेसची चिंता वाढवणाऱ्या आहेत.
गेली ४४ वर्षे काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या गुरुदास कामत यांनी नुकताच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. नव्या नेतृत्वाला वाव देण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मात्र, दिल्ली दरबारी कमी झालेलं महत्त्व आणि हायकमांडकडून पक्षांतर्गत विरोधकांना मिळणाऱ्या पाठबळामुळंच कामत यांना हा निर्णय घ्यावा लागल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी संजय निरुपम यांची झालेली नियुक्ती आणि त्यानंतर पद्धतीशीरपणे होत असलेलं कामत समर्थकांचं खच्चीकरण यास कारणीभूत असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. याच संतापातून मुंबई महापालिकेतील २५ नगरसेवकांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. कामत यांना न्याय न मिळाल्यास राजीनामा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचं समजतं.
मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी हे बंड पुकारलं आहे. आंबेरकर हे कामत यांचे खंदे समर्थक मानले जातात. मात्र, संजय निरुपम हे मुंबई अध्यक्षपदी आल्यानंतर आंबेरकर यांची उचलबांगडी करून भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या प्रवीण छेडा यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. तेव्हापासून कामत समर्थकांमध्ये तीव्र नाराजी होती. कामत यांच्या राजीनाम्याच्या निमित्तानं ही नाराजी उफाळून आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या पक्ष त्यागामुळं मुंबई काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे. मुंबई काँग्रेसमध्ये दबदबा असलेल्या कामत यांच्यासाठी पक्षाचे तब्बल २५ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या घडामोडी काँग्रेसची चिंता वाढवणाऱ्या आहेत.
गेली ४४ वर्षे काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या गुरुदास कामत यांनी नुकताच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. नव्या नेतृत्वाला वाव देण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मात्र, दिल्ली दरबारी कमी झालेलं महत्त्व आणि हायकमांडकडून पक्षांतर्गत विरोधकांना मिळणाऱ्या पाठबळामुळंच कामत यांना हा निर्णय घ्यावा लागल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी संजय निरुपम यांची झालेली नियुक्ती आणि त्यानंतर पद्धतीशीरपणे होत असलेलं कामत समर्थकांचं खच्चीकरण यास कारणीभूत असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. याच संतापातून मुंबई महापालिकेतील २५ नगरसेवकांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. कामत यांना न्याय न मिळाल्यास राजीनामा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचं समजतं.
मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी हे बंड पुकारलं आहे. आंबेरकर हे कामत यांचे खंदे समर्थक मानले जातात. मात्र, संजय निरुपम हे मुंबई अध्यक्षपदी आल्यानंतर आंबेरकर यांची उचलबांगडी करून भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या प्रवीण छेडा यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. तेव्हापासून कामत समर्थकांमध्ये तीव्र नाराजी होती. कामत यांच्या राजीनाम्याच्या निमित्तानं ही नाराजी उफाळून आली आहे.