मुंबईः महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ लाख २० हजार ५०४वर पोहचली आहे. चिंता वाढवणारी बाब म्हणजे शहरांबरोबरच ग्रामीण भागात करोनाचा प्रसार वाढतो आहे. मुंबईत आज १०० रुग्ण करोनानं दगावले आहेत तर भिवंडीत एकूण २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात आज ३ हजार ७५२ नवीन रुग्ण आढळले आहेत.
राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे करोनावर मात करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आज दिवसभरात १६७२ रुग्णांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत ६०,८३८ रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडीवारीनुसार आज १०० रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यातील ६७ मृत्यू मुंबईतील, २७ भिवंडी, ठाणे - ४ तर वसई- विरार, नागपूर येथील प्रत्येकी १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये ६६ पुरुष आणि ३४ महिला आहेत. यात ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे ४५ रुग्ण, ४० ते ५९ वयोगटातील ४६ रुग्ण आणि ४० वर्षाखालील नऊ रुग्णांचा समावेश आहे. १३ मृतांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदान, ह्दयरोग असे अतिजोखिमीचे आजार आढळले आहेत.
वाचाः मुंबईत मुसळधार पाऊस; धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला
रुग्ण वाढीचा आणि रुग्ण दुप्पट होण्याचा वेग
९ मार्च २०२० रोजी राज्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर मागील ३ महिन्यांच्या काळात राज्यातील रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरूनच करोनाचा प्रसार मंदावत असल्याचं स्पष्ट होतं आहे.
राज्यात करोना चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. आजपर्यंत ७ लाख १७ हजार ६८३ नमुने प्रयोगशाळांत पाठवण्यात आले असून त्यातील १ लाख २० हजार ५०४नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८१ हजार ६५० लोक होम क्वारंटाइनमध्ये तर २६ हजार ७४० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचाः करोनाच्या लढ्याला आता डिजीटल बळ; BMCनं सुरू केलं हे अॅप
राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे करोनावर मात करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आज दिवसभरात १६७२ रुग्णांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत ६०,८३८ रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडीवारीनुसार आज १०० रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यातील ६७ मृत्यू मुंबईतील, २७ भिवंडी, ठाणे - ४ तर वसई- विरार, नागपूर येथील प्रत्येकी १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये ६६ पुरुष आणि ३४ महिला आहेत. यात ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे ४५ रुग्ण, ४० ते ५९ वयोगटातील ४६ रुग्ण आणि ४० वर्षाखालील नऊ रुग्णांचा समावेश आहे. १३ मृतांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदान, ह्दयरोग असे अतिजोखिमीचे आजार आढळले आहेत.
वाचाः मुंबईत मुसळधार पाऊस; धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला
रुग्ण वाढीचा आणि रुग्ण दुप्पट होण्याचा वेग
९ मार्च २०२० रोजी राज्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर मागील ३ महिन्यांच्या काळात राज्यातील रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरूनच करोनाचा प्रसार मंदावत असल्याचं स्पष्ट होतं आहे.
राज्यात करोना चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. आजपर्यंत ७ लाख १७ हजार ६८३ नमुने प्रयोगशाळांत पाठवण्यात आले असून त्यातील १ लाख २० हजार ५०४नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८१ हजार ६५० लोक होम क्वारंटाइनमध्ये तर २६ हजार ७४० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचाः करोनाच्या लढ्याला आता डिजीटल बळ; BMCनं सुरू केलं हे अॅप