म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर त्वरित आचारसंहिता लागू झाली असून आत्तापर्यंत आचारसंहिताभंग, विनापरवाना शस्त्र बाळगणे, अवैध मद्य बाळगणे, सामाजिक शांतता भंग करणे अशा वेगवेगळ्या प्रकरणांत ४७७ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी बुधवारी दिली. विशेष म्हणजे परवानाधारकांकडून जवळपास ३३ हजार रिव्हॉल्व्हर, रायफल यासारखी शस्त्रे जमा करण्यात आली असून राज्यभरात १० हजारांहून अधिक तपासणी नाके कार्यरत आहेत.
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यात एकीकडे काटेकोर पद्धतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे, तर दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यभरात पोलिस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून देखील कारवाई सुरू आहे. सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक शांतता, सुरक्षितता भंग करणे, बेकायदेशीररित्या जमाव करणे, तलवारी, बंदुका आदी शस्त्रे, स्फोटक पदार्थ बाळगणे आदी स्वरुपाच्या प्रकरणांत विविध कलमांखाली ११३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, अंमली पदार्थ बाळगणे, विक्रीसाठी वाहतूक करणे आदी स्वरुपाच्या २८ प्रकरणांत एनपीडीएस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात आजपर्यंत परवाना नसलेली ६२६ शस्त्रे, २६० काडतूसे आणि ४६ जिलेटीन आदी स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तर, शस्त्र परवानाधारकांकडून ३२ हजार ९३७ शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. २४ प्रकरणांत परवाना असलेली शस्त्रे कायद्याचा भंग व इतर कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत. तसेच १६६ शस्त्रपरवाने रद्द करण्यात आले आहेत. स्फोटके कायद्यानुसार तीन प्रकरणांत, महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत २३४ प्रकरणांत, मालमत्तेचे विद्रुपीकरण अधिनियमांतर्गत २५ प्रकरणांत, तर अन्य विविध अधिनियमांतर्गत आठ प्रकरणांत कारवाई करण्यात आली आहे.
फौजदारी व्यवहार संहितेअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची ४१ हजार ६३८ प्रकरणे विचारात घेण्यात आली असून १५ हजार ८३८ प्रकरणात इंटरिम बॉण्ड घेण्यात आले आहेत. २७ हजार ४५७ प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आली आहेत. याशिवाय राज्यात १० हजार ६०५ तपासणी नाके कार्यरत असल्याची माहिती दिलीप शिंदे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर त्वरित आचारसंहिता लागू झाली असून आत्तापर्यंत आचारसंहिताभंग, विनापरवाना शस्त्र बाळगणे, अवैध मद्य बाळगणे, सामाजिक शांतता भंग करणे अशा वेगवेगळ्या प्रकरणांत ४७७ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी बुधवारी दिली. विशेष म्हणजे परवानाधारकांकडून जवळपास ३३ हजार रिव्हॉल्व्हर, रायफल यासारखी शस्त्रे जमा करण्यात आली असून राज्यभरात १० हजारांहून अधिक तपासणी नाके कार्यरत आहेत.
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यात एकीकडे काटेकोर पद्धतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे, तर दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यभरात पोलिस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून देखील कारवाई सुरू आहे. सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक शांतता, सुरक्षितता भंग करणे, बेकायदेशीररित्या जमाव करणे, तलवारी, बंदुका आदी शस्त्रे, स्फोटक पदार्थ बाळगणे आदी स्वरुपाच्या प्रकरणांत विविध कलमांखाली ११३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, अंमली पदार्थ बाळगणे, विक्रीसाठी वाहतूक करणे आदी स्वरुपाच्या २८ प्रकरणांत एनपीडीएस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात आजपर्यंत परवाना नसलेली ६२६ शस्त्रे, २६० काडतूसे आणि ४६ जिलेटीन आदी स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तर, शस्त्र परवानाधारकांकडून ३२ हजार ९३७ शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. २४ प्रकरणांत परवाना असलेली शस्त्रे कायद्याचा भंग व इतर कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत. तसेच १६६ शस्त्रपरवाने रद्द करण्यात आले आहेत. स्फोटके कायद्यानुसार तीन प्रकरणांत, महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत २३४ प्रकरणांत, मालमत्तेचे विद्रुपीकरण अधिनियमांतर्गत २५ प्रकरणांत, तर अन्य विविध अधिनियमांतर्गत आठ प्रकरणांत कारवाई करण्यात आली आहे.
फौजदारी व्यवहार संहितेअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची ४१ हजार ६३८ प्रकरणे विचारात घेण्यात आली असून १५ हजार ८३८ प्रकरणात इंटरिम बॉण्ड घेण्यात आले आहेत. २७ हजार ४५७ प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आली आहेत. याशिवाय राज्यात १० हजार ६०५ तपासणी नाके कार्यरत असल्याची माहिती दिलीप शिंदे यांनी दिली.