अ‍ॅपशहर

नाशिक, पुणे, वर्ध्यात गालबोट; ७ जण बुडाले

गणेश विसर्जनावेळी नाशिक, पुणे आणि वर्धा जिल्ह्यात दुःखद घटना घडल्या आहेत. वेगवेगळ्या घटनांमध्ये गणेश विसर्जनासाठी पाण्यात उतरलेल्या ७ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी दोघांचे मृतदेह हाती आले आहे तर पाच बेपत्ता आहेत.

Maharashtra Times 15 Sep 2016, 7:15 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 people drowning in ganesh visarjan nashik wardha
नाशिक, पुणे, वर्ध्यात गालबोट; ७ जण बुडाले


गणेश विसर्जनावेळी नाशिक, पुणे आणि वर्धा जिल्ह्यात दुःखद घटना घडल्या आहेत. वेगवेगळ्या घटनांमध्ये गणेश विसर्जनासाठी पाण्यात उतरलेल्या ७ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी दोघांचे मृतदेह हाती आले आहे तर पाच बेपत्ता आहेत.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये गणपती विर्सजनाला भंडारा येथील बंधाऱ्यात उतरलेले दोघे जण बुडाले. यात एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. दुसऱ्याचा शोध सुरू आहे. हे दोघेजण मुसळगावचे राहणारे होते. आणखी एका घटनेत गंगापूर रोड, बेंडकुले मळा येथील चौघे जण गोदावारीत बुडले. यापैकी तिघांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश. पण या घटनेत एका १५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर पुण्यात धायरीफटा पुलाजवळ विसर्जनाकरता गेलेला युवक बुडला. अग्निशमन दलाकडून त्याचा शोध सुरू आहे.

वर्धा जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील तारसावंगा येथे वर्धा नदीची उपनदी असलेल्या कड नदीच्या पात्रात उतरलेले तीन तरुण नदीत बुडाले. अद्याप तिघांचाही पत्ता लागलेला नाही. त्यांचा शोध सुरू आहे. एकूण पाच तरुण विसर्जनाला गेले होते. यावेळी दोघे बचावले मात्र तिघे अजूनही बेपत्ता आहेत. हंसराज सोमकुवर, पंकज नेहारे आणि केवल मेश्राम अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. बेपत्ता तिघे तरुण माणिकवाडा येथील आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज