अ‍ॅपशहर

तीन वर्षांत ५२०वेळा रुळांना तडे!

मुंबईच्या लोकल सेवा विस्कळीत होण्यास रेल्वे रुळास पडलेले तडेदेखील कारणीभूत असतात. ​हिवाळ्यात, उन्हाळ्यात रूळ प्रसरण, आकुंचन पावल्याने रुळास तडा जाण्याचे एक कारण त्यामागे आहे.

Maharashtra Times 22 Dec 2017, 4:00 am
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरील घटना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 520 times track rived in last three years
तीन वर्षांत ५२०वेळा रुळांना तडे!


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबईच्या लोकल सेवा विस्कळीत होण्यास रेल्वे रुळास पडलेले तडेदेखील कारणीभूत असतात. ​हिवाळ्यात, उन्हाळ्यात रूळ प्रसरण, आकुंचन पावल्याने रुळास तडा जाण्याचे एक कारण त्यामागे आहे. आतापर्यंत २०१४पासून मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावरील रुळांना तडे गेल्याच्या घटनांची संख्या तब्बल ५२० इतकी आहे! त्यात, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रुळांस तडे जाण्याचे आणि वेल्डिंग तुटण्याचे ३५६ प्रकार नोंदविण्यात आले.

लोकल सुरक्षितपणे चालविण्यासाठी देखभाल, दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. काहीवेळा वेगवेगळ्या कारणांनी रेल्वे रुळास तडे जात असतात. अशा तुटलेल्या रुळांवरून वाहतूक सुरू ठेवल्यास अपघातांची भीती असते. यासंदर्भात माहिती अधिकाराखाली समीर झवेरी यांनी मागविलेल्या माहितीनुसार, २०१४पासून ऑक्टोबर, २०१७ कालावधीत ५२० वेळा रूळ, वेल्डिंग तुटण्याची नोंद आहे.

वातावरणातील बदलांप्रमाणेच रुळांवर फेकण्यात येणारा कचराही रुळांची रचना खिळखिळी करण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे लोकल मार्गावर येणारा कचरा रोखल्यास रुळांना धोका उद्भवणार नाही, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत.

रेल्वे रुळांस तडे गेल्याचे प्रकार वेळीच लक्षात न आल्यास अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी रुळांची तपासणी करणाऱ्या गँगमनची भूमिका महत्त्वाची ठरते. काही वेळा रुळांना तडा गेल्याचे मोटरमन, मेल/एक्स्प्रेसचे ड्रायव्हर यांच्याही नजरेस पडते. तसा प्रकार दिसल्यास ते अन्य गाड्यांना सावध करून अपघात टाळण्यास सहाय्य करतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज