म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मध्य रेल्वेवर अनेक वर्षांपासून दिवा-ठाण्यामधील प्रलंबित राहिलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकच्या कामाच्या पूर्ततेसाठी डिसेंबर २०१७चे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अनधिकृत बांधकामे हटविण्यापासून ते स्थानिक पातळीवर न मिळणाऱ्या सहकार्यामुळे यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र आता यातून मार्ग काढण्यात आल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळतर्फे (एमआरव्हीसी) सांगण्यात आले.
‘एमआरव्हीसी’ने हाती घेतलेल्या मुंबई शहर वाहतूक प्रकल्पांतर्गत (एमयूटीपी-२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याणमध्ये पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा समावेश आहे. त्यासाठी चार टप्पे आखण्यात आले आहेत. पैकी दोन टप्पे पूर्ण झाले आहेत, तर ठाणे-दिवा आणि कुर्ला-सीएसएमटी मार्गावरील मार्गिकेचे काम अजूनही कागदावरच राहिले आहे. यातील ठाणे-दिव्यातील अडचणी दूर झाल्या असल्या तरी सीएसएमटी-कुर्लामध्ये मार्गिका बनविण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे.
दिवा आणि ठाण्यातील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेत विविध अडचणी आल्या होत्या. त्यात मुंब्रा, रेतीबंदरकडील रखडलेल्या कामांचाही समावेश होता. इथल्या धीम्या मार्गावरील जुन्या बोगद्याजवळ नवीन बोगद्याचे काम हाती घेण्यात आले, परंतु हा बोगदा १०० वर्षे जुना असल्याने त्यास कुठेही धक्का न लागण्याची काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे नव्या बोगद्याच्या कामाच्या पूर्ततेस जास्त कालावधी लागत आहे. इथले काम पूर्ण झाल्यानंतर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेतील अडथळे दूर होणार आहेत.
पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेत कळवा आणि मुंब्रा स्थानकामधील अनधिकृत बांधकामे रेल्वेच्या दृष्टीने आव्हान ठरले होते. ती काढण्यासाठी स्थानिकांकडून होत असलेला विरोध संपुष्टात आल्याने रेल्वे अधिकाऱ्यांसमोरील चिंता दूर झाली आहे. या मार्गिकांमुळे लोकल आणि मेल/एक्स्प्रेसची वाहतूक स्वतंत्रपणे करणे शक्य होणार आहे. तसे झाल्यास लोकल सेवांवरील ताण कमी होऊन लोकल आणि मेल/एक्स्प्रेसचा वक्तशीरपणा वाढण्यास मदत होणार आहे.
मध्य रेल्वेवर अनेक वर्षांपासून दिवा-ठाण्यामधील प्रलंबित राहिलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकच्या कामाच्या पूर्ततेसाठी डिसेंबर २०१७चे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अनधिकृत बांधकामे हटविण्यापासून ते स्थानिक पातळीवर न मिळणाऱ्या सहकार्यामुळे यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र आता यातून मार्ग काढण्यात आल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळतर्फे (एमआरव्हीसी) सांगण्यात आले.
‘एमआरव्हीसी’ने हाती घेतलेल्या मुंबई शहर वाहतूक प्रकल्पांतर्गत (एमयूटीपी-२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याणमध्ये पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा समावेश आहे. त्यासाठी चार टप्पे आखण्यात आले आहेत. पैकी दोन टप्पे पूर्ण झाले आहेत, तर ठाणे-दिवा आणि कुर्ला-सीएसएमटी मार्गावरील मार्गिकेचे काम अजूनही कागदावरच राहिले आहे. यातील ठाणे-दिव्यातील अडचणी दूर झाल्या असल्या तरी सीएसएमटी-कुर्लामध्ये मार्गिका बनविण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे.
दिवा आणि ठाण्यातील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेत विविध अडचणी आल्या होत्या. त्यात मुंब्रा, रेतीबंदरकडील रखडलेल्या कामांचाही समावेश होता. इथल्या धीम्या मार्गावरील जुन्या बोगद्याजवळ नवीन बोगद्याचे काम हाती घेण्यात आले, परंतु हा बोगदा १०० वर्षे जुना असल्याने त्यास कुठेही धक्का न लागण्याची काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे नव्या बोगद्याच्या कामाच्या पूर्ततेस जास्त कालावधी लागत आहे. इथले काम पूर्ण झाल्यानंतर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेतील अडथळे दूर होणार आहेत.
पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेत कळवा आणि मुंब्रा स्थानकामधील अनधिकृत बांधकामे रेल्वेच्या दृष्टीने आव्हान ठरले होते. ती काढण्यासाठी स्थानिकांकडून होत असलेला विरोध संपुष्टात आल्याने रेल्वे अधिकाऱ्यांसमोरील चिंता दूर झाली आहे. या मार्गिकांमुळे लोकल आणि मेल/एक्स्प्रेसची वाहतूक स्वतंत्रपणे करणे शक्य होणार आहे. तसे झाल्यास लोकल सेवांवरील ताण कमी होऊन लोकल आणि मेल/एक्स्प्रेसचा वक्तशीरपणा वाढण्यास मदत होणार आहे.