६६६ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान
मुंबई : राज्यातील १८ जिल्ह्यांमधील सुमारे तीन हजार ६६६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी सरासरी ८१ टक्के मतदान झाले असा प्राथमिक अंदाज आहे. यात थेट सरपंचपद आणि सदस्यपदांसाठीच्या मतदानाचा समावेश होता, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
Maharashtra Times 17 Oct 2017, 4:00 am
मुंबई : राज्यातील १८ जिल्ह्यांमधील सुमारे तीन हजार ६६६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी सरासरी ८१ टक्के मतदान झाले असा प्राथमिक अंदाज आहे. यात थेट सरपंचपद आणि सदस्यपदांसाठीच्या मतदानाचा समावेश होता, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सुमारे चार हजार ११९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार होते. परंतु काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्याचबरोबर इतर विविध कारणांमुळे काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे सुमारे तीन हजार ६६६ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदान झाले.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सुमारे चार हजार ११९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार होते. परंतु काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्याचबरोबर इतर विविध कारणांमुळे काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे सुमारे तीन हजार ६६६ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदान झाले.