म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुबलक पाणी साठ्यामुळे आजवर निर्धास्त असलेल्या मुंबईला पावसाने दडी मारल्याने पाणीचिंता सतावू लागली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी खालावत आहे. तलावांत गुरुवारी ९.७६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. हा साठा केवळ महिनाभर पुरेल एवढाच असल्याने पालिकेने कपातीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार असून सुमारे १० टक्के पाणीकपात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात अद्याप दमदार पाऊस नसल्याने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालेली नाही. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या तलावांमध्ये गुरुवारी एक लाख ४१ हजार २४२ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा साठा सुमारे पाच ते सहा टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे या आठवड्यात तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस होणे आवश्यक आहे. अपेक्षित पाऊस न झाल्यास दोन दिवसांत कपातीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या जलविभागाचे उपायुक्त अजय राठोड यांनी दिली.
सातही तलाव क्षेत्रांत आतापर्यंत ४३ ते २७३ मिमी इतका पाऊस झाला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विहार व तुळशी तलावांत अनुक्रमे २४४ मिमी व २७३ मिमी पाऊस झाला. शहराला सर्वाधिक दररोज १,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात १७० मिमी, ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर व तानसा तलाव क्षेत्रात अनुक्रमे १०२ मिमी व १७३ मिमी पाऊस झाला. जून २०२१मध्ये तुळशी तलावात सर्वाधिक १,४१४ मिमी पावसाची नोंद झाली होती. यावेळी या तलावात गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्केही पाऊस झाला नाही, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
ठाणे, भिवंडीलाही झळ
मुंबई महापालिकेतर्फे ठाणे, भिवंडी महापालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईत पाणी कपात लागू झाल्यास ठाणे, भिवंडीकरांनाही पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.
तीन वर्षांतील २३ जूनचा साठा (दशलक्ष लिटर)
२०२० १,४८,०५९
२०२१ २,२१,८९०
२०२२ १,४१,२४२
तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा ०
मोडकसागर ४६,७५३
तानसा ६,२८९
मध्य वैतरणा १७,९६१
भातसा ६४,२५८
विहार ३,८७८
तुळसी २,१०३
मुबलक पाणी साठ्यामुळे आजवर निर्धास्त असलेल्या मुंबईला पावसाने दडी मारल्याने पाणीचिंता सतावू लागली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी खालावत आहे. तलावांत गुरुवारी ९.७६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. हा साठा केवळ महिनाभर पुरेल एवढाच असल्याने पालिकेने कपातीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार असून सुमारे १० टक्के पाणीकपात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात अद्याप दमदार पाऊस नसल्याने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालेली नाही. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या तलावांमध्ये गुरुवारी एक लाख ४१ हजार २४२ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा साठा सुमारे पाच ते सहा टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे या आठवड्यात तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस होणे आवश्यक आहे. अपेक्षित पाऊस न झाल्यास दोन दिवसांत कपातीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या जलविभागाचे उपायुक्त अजय राठोड यांनी दिली.
सातही तलाव क्षेत्रांत आतापर्यंत ४३ ते २७३ मिमी इतका पाऊस झाला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विहार व तुळशी तलावांत अनुक्रमे २४४ मिमी व २७३ मिमी पाऊस झाला. शहराला सर्वाधिक दररोज १,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात १७० मिमी, ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर व तानसा तलाव क्षेत्रात अनुक्रमे १०२ मिमी व १७३ मिमी पाऊस झाला. जून २०२१मध्ये तुळशी तलावात सर्वाधिक १,४१४ मिमी पावसाची नोंद झाली होती. यावेळी या तलावात गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्केही पाऊस झाला नाही, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
ठाणे, भिवंडीलाही झळ
मुंबई महापालिकेतर्फे ठाणे, भिवंडी महापालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईत पाणी कपात लागू झाल्यास ठाणे, भिवंडीकरांनाही पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.
तीन वर्षांतील २३ जूनचा साठा (दशलक्ष लिटर)
२०२० १,४८,०५९
२०२१ २,२१,८९०
२०२२ १,४१,२४२
तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा ०
मोडकसागर ४६,७५३
तानसा ६,२८९
मध्य वैतरणा १७,९६१
भातसा ६४,२५८
विहार ३,८७८
तुळसी २,१०३