मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
देशभेद्या, सांप्रदायिक, भांडवल धार्जिण्या, देशविघातक फुटीर शक्तींना निर्धारानं 'चले जाव' सांगण्यासाठी राष्ट्र सेवा दल मुंबईतील प्रसिद्ध ऑगस्ट क्रांती मैदानात ९ ऑगस्टला 'चले जाव'चा नारा देणार आहे. ऑगस्ट क्रांती मैदानात 'छोडो भारत'चे अमृतमहोत्सव वर्ष साजरं करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं स्वातंत्र्य संग्रामाची आठवण जागवणाऱ्या या कार्यक्रमात अनेक संघटना, गट, विचारवंत, अभ्यासक, पत्रकार, कलावंत, व्यावसायिक आणि 'चले जाव 'चळवळीतील गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगणारे संवेदनशील नागरिक यात सहभागी होत आहेत.
१९४२च्या आंदोलनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्र सेवा दलाने महाराष्ट्रात दोन ' प्रबोधन यात्रा ' सुरू केल्या आहेत. या यात्रा १ ऑगस्ट २०१७ ला निघाल्या आहेत, एक तळोदा येथील 'रावलापाणी' येथून, तर दुसरी, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील येडे मच्छिन्द्र या गावातून. या दोन्ही यात्रा ८ ऑगस्टला मुंबईत पोहोचतायत.
९ ऑगस्टला सकाळी ८.30 वाजता गिरगाव चौपाटी पासून ऑगस्ट क्रांती मैदाना पर्यंत 'अभिवादन मोर्चा ' निघणार आहे. त्यात या दोन्ही यात्रा विलीन होणार आहेत.
'अभिवादन मोर्चा 'ऑगस्ट क्रांती मैदानावर आल्या नंतर सेवा सदनच्या सभागृहात 'छोडो भारत 'च्या अमृतमहोत्सवा निमित्त 'अभिवादन सभा 'होणार आहे.
जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ.जी.जी.पारीख यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या 'अभिवादन मोर्चा'त आणि त्या नंतर राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सुरेश खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली आहे.
महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी,मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र मुणगेकर, जेष्ठ पत्रकार निखिल वागळे,राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुरेश खैरनार, प्रा. पुष्पा भावे, गजानन खातू, माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील,रोहिणी गवाणकर, मुक्ता दाभोलकर, सुरेखा दळवी,माजी पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर,आमदार विद्या चव्हाण,तिस्ता सेटलवाड,शाहीर संभाजी भगत, पत्रकार जयंत पवार, युसूफ मेहरअली सेंटरच्या गुडडी,विश्वनाथ सचदेव,आनंद पटवर्धन, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, दत्ता इस्वलकर, उर्मिला पवार यांच्यासह अनेक महाविद्यालयं. शाळांचे विदयार्थी, शिक्षक,पालक आदी विविध पक्ष,संघटना, संवेदनशील नागरिक या आंदोलनात सहभागी होत आहेत.
देशभेद्या, सांप्रदायिक, भांडवल धार्जिण्या, देशविघातक फुटीर शक्तींना निर्धारानं 'चले जाव' सांगण्यासाठी राष्ट्र सेवा दल मुंबईतील प्रसिद्ध ऑगस्ट क्रांती मैदानात ९ ऑगस्टला 'चले जाव'चा नारा देणार आहे. ऑगस्ट क्रांती मैदानात 'छोडो भारत'चे अमृतमहोत्सव वर्ष साजरं करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं स्वातंत्र्य संग्रामाची आठवण जागवणाऱ्या या कार्यक्रमात अनेक संघटना, गट, विचारवंत, अभ्यासक, पत्रकार, कलावंत, व्यावसायिक आणि 'चले जाव 'चळवळीतील गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगणारे संवेदनशील नागरिक यात सहभागी होत आहेत.
१९४२च्या आंदोलनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्र सेवा दलाने महाराष्ट्रात दोन ' प्रबोधन यात्रा ' सुरू केल्या आहेत. या यात्रा १ ऑगस्ट २०१७ ला निघाल्या आहेत, एक तळोदा येथील 'रावलापाणी' येथून, तर दुसरी, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील येडे मच्छिन्द्र या गावातून. या दोन्ही यात्रा ८ ऑगस्टला मुंबईत पोहोचतायत.
९ ऑगस्टला सकाळी ८.30 वाजता गिरगाव चौपाटी पासून ऑगस्ट क्रांती मैदाना पर्यंत 'अभिवादन मोर्चा ' निघणार आहे. त्यात या दोन्ही यात्रा विलीन होणार आहेत.
'अभिवादन मोर्चा 'ऑगस्ट क्रांती मैदानावर आल्या नंतर सेवा सदनच्या सभागृहात 'छोडो भारत 'च्या अमृतमहोत्सवा निमित्त 'अभिवादन सभा 'होणार आहे.
जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ.जी.जी.पारीख यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या 'अभिवादन मोर्चा'त आणि त्या नंतर राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सुरेश खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली आहे.
महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी,मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र मुणगेकर, जेष्ठ पत्रकार निखिल वागळे,राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुरेश खैरनार, प्रा. पुष्पा भावे, गजानन खातू, माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील,रोहिणी गवाणकर, मुक्ता दाभोलकर, सुरेखा दळवी,माजी पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर,आमदार विद्या चव्हाण,तिस्ता सेटलवाड,शाहीर संभाजी भगत, पत्रकार जयंत पवार, युसूफ मेहरअली सेंटरच्या गुडडी,विश्वनाथ सचदेव,आनंद पटवर्धन, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, दत्ता इस्वलकर, उर्मिला पवार यांच्यासह अनेक महाविद्यालयं. शाळांचे विदयार्थी, शिक्षक,पालक आदी विविध पक्ष,संघटना, संवेदनशील नागरिक या आंदोलनात सहभागी होत आहेत.