मुंबई: मुंबई दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले की, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचं जुनं नातं आहे. हे नातं अधिक सकस होण्यासाठी ममता बॅनर्जी मुंबईत आल्या आहेत. आज मी आणि माझ्या सहकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. राष्ट्रीय स्तरावर जी परिस्थिती आहे ती पाहता सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. देशात एक नवा मजबूत पर्याय उभा करणे अत्यंत आवश्यक आहे, असे पवार यांनी सांगितले.(a new strong alternative is needed in the country says sharad pawar after meeting with mamata banerjee) क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! दक्षिण आफ्रिकेतील 'त्या' करोनाग्रस्त प्रवाशासोबत होता आणखी एक डोंबिवलीचा प्रवासी, केडीएमसी सतर्क
काँग्रेस या नव्या एकत्रिकरणात असेल का असा प्रश्न विचारल्यानंतर पवार म्हणाले की, काँग्रेसबाबत मी बोलत नाही, मी म्हणतोय की सर्वांनी एकत्र येण्याची आज गरज आहे. केंद्रात निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात जे कोणी लढायला तयार आहेत, अशा सर्वांना एकत्र घेतलं जाईल असे पवार म्हणाले. ममता बॅनर्जी आणि आमच्यात अतिशय सकारात्मक चर्चा झाल्याचंही पवार यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! काळाचौकीत सव्वा तीन महिन्यांच्या बालिकेचं अपहरण, परिसरात खळबळ
काल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांची ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली. दोन वर्षांपूर्वी देखील उद्धव आणि मी संजय राऊत त्यांची भेट घेतल्याची आठवण या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी काढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोघांध्ये एक वेगळे नाते असल्याचेही ते म्हणाले. दोघांमध्ये नेहमीच समन्वय राहिलेला आहे. मग तो कोविडचा प्रश्न असो की इतर राजकारण असेल. मुख्यमंत्री ठाकरे आणि ममतादीदी यांचं जे नातं असंच पुढे घेऊन जायचं आहेच, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- कोकणात राष्ट्रवादी-शिवसेना संघर्षाची चिन्हे; खासदार सुनील तटकरे यांची भास्कर जाधवांवर टीका
काँग्रेस या नव्या एकत्रिकरणात असेल का असा प्रश्न विचारल्यानंतर पवार म्हणाले की, काँग्रेसबाबत मी बोलत नाही, मी म्हणतोय की सर्वांनी एकत्र येण्याची आज गरज आहे. केंद्रात निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात जे कोणी लढायला तयार आहेत, अशा सर्वांना एकत्र घेतलं जाईल असे पवार म्हणाले. ममता बॅनर्जी आणि आमच्यात अतिशय सकारात्मक चर्चा झाल्याचंही पवार यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! काळाचौकीत सव्वा तीन महिन्यांच्या बालिकेचं अपहरण, परिसरात खळबळ
काल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांची ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली. दोन वर्षांपूर्वी देखील उद्धव आणि मी संजय राऊत त्यांची भेट घेतल्याची आठवण या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी काढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोघांध्ये एक वेगळे नाते असल्याचेही ते म्हणाले. दोघांमध्ये नेहमीच समन्वय राहिलेला आहे. मग तो कोविडचा प्रश्न असो की इतर राजकारण असेल. मुख्यमंत्री ठाकरे आणि ममतादीदी यांचं जे नातं असंच पुढे घेऊन जायचं आहेच, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- कोकणात राष्ट्रवादी-शिवसेना संघर्षाची चिन्हे; खासदार सुनील तटकरे यांची भास्कर जाधवांवर टीका