मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
स्वतः निवडणूक लढवायची नाही, तर किंगमेकर व्हायचं... 'मातोश्री'वरून रिमोट कंट्रोलने सूत्रं हलवायची... हा शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून चालत आलेला आणि उद्धव ठाकरे यांनी जपलेला वारसा बहुधा आदित्य ठाकरेंना तितकासा रुचलेला नसावा. कारण, भविष्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत ठाकरे घराण्यातील तिसऱ्या पिढीचा शिलेदार असलेल्या आदित्यने दिले आहेत.
'बाळासाहेबांनी त्यांच्या विचारांच्या आधारे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांनी कुणावरही लादला नाही. निवडणूक लढवणं चुकीचं असल्याचं त्यांनी कधीच म्हटलेलं नाही. त्यामुळे गरज पडल्यास मी स्वतः निवडणूक लढवेन. विधानसभा सदस्य म्हणून अनेक कामं केली जाऊ शकतात', असं सूचक मत आदित्य यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.
राज्यात मध्यावधी निवडणुकीचे वारे वाहत असताना, शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याचं केलेलं सूतोवाच महत्त्वाचं मानलं जातंय.
मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या प्रचार मोहिमेत आदित्य ठाकरे सक्रिय आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रचार सभा आणि स्वतंत्रपणे रोड शो करत असतानाच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते संपूर्ण प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची मुलाखत घेण्यात आली. तेव्हा, केंद्र आणि राज्य सरकारच्या खोटेपणावर त्यांनी टीकास्त्र सोडलं. काँग्रेस सरकारच्या काळात आलेली मेट्रोही आम्हीच आणली असं भाजपचे नेते बिनधास्त सांगतात. हे राजकारण अत्यंत बालिश आहे, अशी चपराक त्यांनी लगावली.
स्वतः निवडणूक लढवायची नाही, तर किंगमेकर व्हायचं... 'मातोश्री'वरून रिमोट कंट्रोलने सूत्रं हलवायची... हा शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून चालत आलेला आणि उद्धव ठाकरे यांनी जपलेला वारसा बहुधा आदित्य ठाकरेंना तितकासा रुचलेला नसावा. कारण, भविष्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत ठाकरे घराण्यातील तिसऱ्या पिढीचा शिलेदार असलेल्या आदित्यने दिले आहेत.
'बाळासाहेबांनी त्यांच्या विचारांच्या आधारे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांनी कुणावरही लादला नाही. निवडणूक लढवणं चुकीचं असल्याचं त्यांनी कधीच म्हटलेलं नाही. त्यामुळे गरज पडल्यास मी स्वतः निवडणूक लढवेन. विधानसभा सदस्य म्हणून अनेक कामं केली जाऊ शकतात', असं सूचक मत आदित्य यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.
राज्यात मध्यावधी निवडणुकीचे वारे वाहत असताना, शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याचं केलेलं सूतोवाच महत्त्वाचं मानलं जातंय.
मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या प्रचार मोहिमेत आदित्य ठाकरे सक्रिय आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रचार सभा आणि स्वतंत्रपणे रोड शो करत असतानाच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते संपूर्ण प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची मुलाखत घेण्यात आली. तेव्हा, केंद्र आणि राज्य सरकारच्या खोटेपणावर त्यांनी टीकास्त्र सोडलं. काँग्रेस सरकारच्या काळात आलेली मेट्रोही आम्हीच आणली असं भाजपचे नेते बिनधास्त सांगतात. हे राजकारण अत्यंत बालिश आहे, अशी चपराक त्यांनी लगावली.