मुंबई : जेवणात विशिष्ट प्रकारची रसायने मिसळून कापड व्यापाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी या व्यापाऱ्याची पत्नी कविता शहा आणि तिचा प्रियकर हितेश जैन या दोघांना अटक केली. या व्यापाऱ्याच्या मृत्यूनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीचा फास आवळताच हितेश याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतःला जखमी करून घेतले आणि हल्ला झाल्याचा तसेच अपहरण करण्यात आल्याचा बनाव केल्याचे समोर आले आहे. पोलिसांची सहानुभूती मिळावी आणि वारंवार चौकशीसाठी बोलावले जाऊ नये, यासाठी त्याने हा प्रयत्न केला.
अशी आहे घटना
सांताक्रूझच्या पश्चिमेकडील गणेशकृपा सोसायटीमध्ये राहणारे कमलकांत शहा यांना ऑगस्टमध्ये पोटदुखीचा त्रास झाला आणि सप्टेंबरमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालामध्ये कमलकांत यांच्या रक्तामध्ये आर्सेनिक व थेलियम ही दोन रसायने मिसळण्यात आल्याचे दिसून आले. सांताक्रूझ पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर प्रकरण गंभीर दिसत असल्याचे पाहून तपास गुन्हे शाखा युनिट ९कडे वर्ग करण्यात आला. खाद्यपदार्थामधून ही जीवघेणी रसायने देण्यात आल्याने घरातील सदस्यांचा सहभाग असल्याची शक्यता वाटत होती. त्यादृष्टीने पोलिसांनी कुटुंबातील सर्वांची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान कमलकांत यांची पत्नी कविता हिची वागणूक फारच संशयास्पद होती. घर सोडून गेलेली कविता दोन लाख रुपये महिना देण्याच्या अटींवरून पुन्हा घरी राहायला आली होती. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केले असता तिच्यामध्ये आणि हितेश जैन यांच्यामध्ये काहीतरी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी त्याचीही चौकशी सुरू केली.
चौकशीच्या चक्रात अडकल्यानंतर हितेशला अटकेची भीती वाटू लागली. पोलिस चौकशी टाळण्यासाठी २५ ऑक्टोबरच्या रात्री हितेशने त्याच्या मित्रांना एक ऑडिओ संदेश पाठवला. यामध्ये नाशिक रोडवर वासिंदजवळ आपल्यावर हल्ला करण्यात आला असून गाडीचीही तोडफोड करण्यात आल्याचे हितेशने सांगितले. हितेशच्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. सांताक्रूझ पोलिसांनी कळवताच शहापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. ज्याप्रमाणे हितेश घटनेचे वर्णन करीत होता ते ऐकून हा केवळ बनाव असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यामुळे शहापूर पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही. मात्र या घटनेनंतर हितेशवर संशय अधिक बळावला.
आणखी आरोपी असण्याची शक्यता
कमलाकांत याच्या हत्येमध्ये कविता आणि हितेश यांना अटक करण्यात आली असली तरी यामध्ये आणखी आरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या दोघांनी हा कट कोणाच्या मदतीने रचला, जीवघेणी रसायने टाकण्याची कल्पना त्यांना कशी सुचली, त्यांनी ही रसायने आणली कुठून? याचा तपास पोलिस करीत आहेत. तसेच कमलकांत यांच्या आईचेही निधनही अशाच लक्षणांमुळे झाल्याने त्याबाबतही या दोघांची कसून चौकशी सुरू आहे.
अशी आहे घटना
सांताक्रूझच्या पश्चिमेकडील गणेशकृपा सोसायटीमध्ये राहणारे कमलकांत शहा यांना ऑगस्टमध्ये पोटदुखीचा त्रास झाला आणि सप्टेंबरमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालामध्ये कमलकांत यांच्या रक्तामध्ये आर्सेनिक व थेलियम ही दोन रसायने मिसळण्यात आल्याचे दिसून आले. सांताक्रूझ पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर प्रकरण गंभीर दिसत असल्याचे पाहून तपास गुन्हे शाखा युनिट ९कडे वर्ग करण्यात आला. खाद्यपदार्थामधून ही जीवघेणी रसायने देण्यात आल्याने घरातील सदस्यांचा सहभाग असल्याची शक्यता वाटत होती. त्यादृष्टीने पोलिसांनी कुटुंबातील सर्वांची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान कमलकांत यांची पत्नी कविता हिची वागणूक फारच संशयास्पद होती. घर सोडून गेलेली कविता दोन लाख रुपये महिना देण्याच्या अटींवरून पुन्हा घरी राहायला आली होती. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केले असता तिच्यामध्ये आणि हितेश जैन यांच्यामध्ये काहीतरी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी त्याचीही चौकशी सुरू केली.
चौकशीच्या चक्रात अडकल्यानंतर हितेशला अटकेची भीती वाटू लागली. पोलिस चौकशी टाळण्यासाठी २५ ऑक्टोबरच्या रात्री हितेशने त्याच्या मित्रांना एक ऑडिओ संदेश पाठवला. यामध्ये नाशिक रोडवर वासिंदजवळ आपल्यावर हल्ला करण्यात आला असून गाडीचीही तोडफोड करण्यात आल्याचे हितेशने सांगितले. हितेशच्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. सांताक्रूझ पोलिसांनी कळवताच शहापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. ज्याप्रमाणे हितेश घटनेचे वर्णन करीत होता ते ऐकून हा केवळ बनाव असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यामुळे शहापूर पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही. मात्र या घटनेनंतर हितेशवर संशय अधिक बळावला.
आणखी आरोपी असण्याची शक्यता
कमलाकांत याच्या हत्येमध्ये कविता आणि हितेश यांना अटक करण्यात आली असली तरी यामध्ये आणखी आरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या दोघांनी हा कट कोणाच्या मदतीने रचला, जीवघेणी रसायने टाकण्याची कल्पना त्यांना कशी सुचली, त्यांनी ही रसायने आणली कुठून? याचा तपास पोलिस करीत आहेत. तसेच कमलकांत यांच्या आईचेही निधनही अशाच लक्षणांमुळे झाल्याने त्याबाबतही या दोघांची कसून चौकशी सुरू आहे.