- केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात राज्यातून ६० लाख स्वाक्षऱ्या
- देशभरातून दोन कोटी सह्या जमा करून काँग्रेस राष्ट्रपतींकडे पाठवणार
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
केंद्रातील मोदी सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना विरोध करतानाच, शेतमालाला हमीभाव दिला नाही, तर संबंधितांविरुद्ध खटला चालवण्याची तरतूद असलेला कायदा करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा मानस आहे. यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची समिती स्थापन केली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी दिली.
केंद्र सरकारने केलेले तीन नवे कृषी कायदे हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करून, काँग्रेसने या कायद्यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलनही केले होते. केंद्रातील भाजप सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने राज्यभर सह्यांची मोहीम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत ६० लाखांहून अधिक सह्या राज्यभरातून गोळा करण्यात आल्या आहेत. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीच्या निवेदनासह या सह्या अ. भा. काँग्रेसकडे पाठवल्या जाणार आहेत. प्रदेश काँग्रेसतर्फे सह्यांची निवेदने पक्षाचे प्रभारी एच के पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. काँग्रेस देशभरातून अशा दोन कोटी सह्या जमा करून राष्ट्रपतींकडे पाठवणार आहे.
केंद्राने संमत केलेला कृषी कायदा हा शेतकरी विरोधी आहे. त्याला विरोध म्हणून दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना हा कायदा समजून सांगितल्यानंतर त्याचा निषेध म्हणून या सह्या घेतल्या आहेत. याप्रश्नी महाविकास आघाडीतील आमचे सहकारी आमच्यासोबत आहेत. मंत्र्यांची समिती स्थापन केली जाईल, शेतकऱ्यांना मदत करण्याचा सरकारचा मानस आहे. व्यापाऱ्यांनी आधारभूत किंमत दिली नाही, तर त्यांच्यावर खटला दाखल करण्याची तरतूद प्रस्तावित कायद्यात करण्याचा विचार आहे, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.
इतक्या मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहीम आतापर्यंत कोणत्याही पक्षाने राबवली नाही. या ६० लाख सह्याच या कायद्याला असलेला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध दर्शवतात. वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधातील महाराष्ट्रातील हा लढा देशाला दिशादर्शक ठरला असल्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले. दादरच्या टिळक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार भाई जगताप, आ. अमिन पटेल, आमदार झिशान सिद्दीकी आदी उपस्थित होते.
- देशभरातून दोन कोटी सह्या जमा करून काँग्रेस राष्ट्रपतींकडे पाठवणार
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
केंद्रातील मोदी सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना विरोध करतानाच, शेतमालाला हमीभाव दिला नाही, तर संबंधितांविरुद्ध खटला चालवण्याची तरतूद असलेला कायदा करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा मानस आहे. यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची समिती स्थापन केली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी दिली.
केंद्र सरकारने केलेले तीन नवे कृषी कायदे हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करून, काँग्रेसने या कायद्यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलनही केले होते. केंद्रातील भाजप सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने राज्यभर सह्यांची मोहीम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत ६० लाखांहून अधिक सह्या राज्यभरातून गोळा करण्यात आल्या आहेत. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीच्या निवेदनासह या सह्या अ. भा. काँग्रेसकडे पाठवल्या जाणार आहेत. प्रदेश काँग्रेसतर्फे सह्यांची निवेदने पक्षाचे प्रभारी एच के पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. काँग्रेस देशभरातून अशा दोन कोटी सह्या जमा करून राष्ट्रपतींकडे पाठवणार आहे.
केंद्राने संमत केलेला कृषी कायदा हा शेतकरी विरोधी आहे. त्याला विरोध म्हणून दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना हा कायदा समजून सांगितल्यानंतर त्याचा निषेध म्हणून या सह्या घेतल्या आहेत. याप्रश्नी महाविकास आघाडीतील आमचे सहकारी आमच्यासोबत आहेत. मंत्र्यांची समिती स्थापन केली जाईल, शेतकऱ्यांना मदत करण्याचा सरकारचा मानस आहे. व्यापाऱ्यांनी आधारभूत किंमत दिली नाही, तर त्यांच्यावर खटला दाखल करण्याची तरतूद प्रस्तावित कायद्यात करण्याचा विचार आहे, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.
इतक्या मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहीम आतापर्यंत कोणत्याही पक्षाने राबवली नाही. या ६० लाख सह्याच या कायद्याला असलेला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध दर्शवतात. वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधातील महाराष्ट्रातील हा लढा देशाला दिशादर्शक ठरला असल्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले. दादरच्या टिळक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार भाई जगताप, आ. अमिन पटेल, आमदार झिशान सिद्दीकी आदी उपस्थित होते.