अ‍ॅपशहर

काळ्या काचांवरील कारवाई सुरूच

वाहनांच्या काचा काळ्या नसाव्यात, असे स्पष्ट निर्देश असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई सुरू आहे. १९ मार्चपासून हाती घेतलेल्या मोहिमेत संपूर्ण राज्यातल दोषी वाहनांची संख्या ९३४पर्यंत गेली असून त्यातील सुमारे ६०० वाहनांवरील काळ्या फिल्म काढण्यात आल्या आहेत.

Maharashtra Times 13 Apr 2018, 3:00 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम car


वाहनांच्या काचा काळ्या नसाव्यात, असे स्पष्ट निर्देश असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई सुरू आहे. १९ मार्चपासून हाती घेतलेल्या मोहिमेत संपूर्ण राज्यातल दोषी वाहनांची संख्या ९३४पर्यंत गेली असून त्यातील सुमारे ६०० वाहनांवरील काळ्या फिल्म काढण्यात आल्या आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वाहनांना काळ्या काचा बसवता येत नाहीत. पण त्याकडे दुर्लक्ष करून अनेक वाहकचालक त्याप्रकारच्या काळ्या काचा बसवत असल्याचे वारंवार पाहायला मिळते. त्याची दखल घेत परिवहन विभागाने १९ ते ३१ मार्चपर्यंत राज्यात काळ्या काचांवरील कारवाईसाठी मोहीम राबवली. या राज्यव्यापी मोहिमेत नाशिक-श्रीरामपूर-अहमदनगर-मालेगाव भागात १५७, पुणे-बारामती-चिंचवड-अकलुजमध्ये ११७, पनवेल-पेण-सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये ११६, मुंबईत २५, ठाणे-कल्याण-वाशी-वसईमध्ये २० गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज