मुंबई: राज्यातील धार्मिकस्थळे खुली व्हावीत म्हणून आध्यात्मिक समन्वय आघाडी आक्रमक झाली आहे. या आध्यात्मिक आघाडीने येत्या शनिवारी २९ ऑगस्ट रोजी राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 'दार उघड उद्धवा, दार उघड', अशी आरोळी देत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं या आघाडीने आज सांगितलं.
राज्यातील धार्मिकस्थळे सुरू करावीत या मागणीसाठी आज राज्यातील विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या समित्यांच्या प्रमुखांची एक बैठक पार पडली. आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पुढाकाराने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीतील मुद्दे
गेल्या पाच महिन्यांपासून करोना संकटामुळे राज्यातील भाविक मानसिकदृष्या खचलेले आहेत. त्यांना आपल्या आराध्य देवतेचे भजन, पूजन, कीर्तन आणि दर्शन करुन मानसिक आधार मिळणे अपरिहार्य आहे. केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्याबाबत ४ जून रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे; त्यानुसार देशभरातील बहुसंख्य व प्रमुख देवस्थाने सुरू देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरू करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी महाराष्ट्र सरकारकडे खूप वेळा मागणी केली. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मॉल, मांस, मदिरा सुरू झाले आणि देवस्थाने मात्र बंद आहेत. "पुनश्च हरि ओम" च्या नावाखाली सर्व व्यवहार सुरु झाले आणि "हरि" ला मात्र लॉक करून ठेवले आहे. यापेक्षाही वाईट म्हणजे दारू पिणारे आनंदात फिरत आहेत. तर भजन-पूजन करणारे भाविक भक्त यांच्यावर मात्र गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत आहे. आस्थेबरोबरच, तिर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचे जीवन व्यवहार यामुळे ठप्प झाले आहेत.
मंदिर, मशीद आणि बुद्धविहारही सुरू करा; 'या' नेत्याचं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्रं
बैठकीतील संमत ठराव
राज्यशासन ठरवेल ते सर्व नियम मान्य करून देवस्थाने आणि भजन, पूजन कीर्तन सुरू करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही महाराष्ट्रातले आघाडी सरकार ती अजूनही मान्य करत नाही. कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या या "ठाकरे सरकार"ला इशारा देण्याकरिता शनिवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आम्ही देवस्थाने सुरू करा या मागणीसाठी राज्यभर "दार उघड उद्धवा दार उघड" अशी आर्त हाक देत "घंटानाद आंदोलन" करणार आहोत. महाराष्ट्राची भाविक जनता, विविध धार्मिक-आध्यात्मिक संस्था,संघटना, विविध देवस्थानांचे विश्वस्त, विविध संप्रदाय तसेच महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असं आवाहन आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केलं आहे.
पावसाळी अधिवेशन: कोविड पॉझिटिव्ह आमदारांना विधिमंडळात प्रवेशबंदी
कहर सुरूच! दिवसभरात ३२९ रुग्णांचा मृत्यू; १२ हजार करोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज
या बैठकीला शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी अध्यक्ष अतुल भोसले, श्रीसिद्धिविनायक मंदिर समितीचे विश्वस्त सुमंत घैसास यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील धार्मिकस्थळे सुरू करावीत या मागणीसाठी आज राज्यातील विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या समित्यांच्या प्रमुखांची एक बैठक पार पडली. आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पुढाकाराने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीतील मुद्दे
गेल्या पाच महिन्यांपासून करोना संकटामुळे राज्यातील भाविक मानसिकदृष्या खचलेले आहेत. त्यांना आपल्या आराध्य देवतेचे भजन, पूजन, कीर्तन आणि दर्शन करुन मानसिक आधार मिळणे अपरिहार्य आहे. केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्याबाबत ४ जून रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे; त्यानुसार देशभरातील बहुसंख्य व प्रमुख देवस्थाने सुरू देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरू करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी महाराष्ट्र सरकारकडे खूप वेळा मागणी केली. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मॉल, मांस, मदिरा सुरू झाले आणि देवस्थाने मात्र बंद आहेत. "पुनश्च हरि ओम" च्या नावाखाली सर्व व्यवहार सुरु झाले आणि "हरि" ला मात्र लॉक करून ठेवले आहे. यापेक्षाही वाईट म्हणजे दारू पिणारे आनंदात फिरत आहेत. तर भजन-पूजन करणारे भाविक भक्त यांच्यावर मात्र गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत आहे. आस्थेबरोबरच, तिर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचे जीवन व्यवहार यामुळे ठप्प झाले आहेत.
मंदिर, मशीद आणि बुद्धविहारही सुरू करा; 'या' नेत्याचं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्रं
बैठकीतील संमत ठराव
राज्यशासन ठरवेल ते सर्व नियम मान्य करून देवस्थाने आणि भजन, पूजन कीर्तन सुरू करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही महाराष्ट्रातले आघाडी सरकार ती अजूनही मान्य करत नाही. कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या या "ठाकरे सरकार"ला इशारा देण्याकरिता शनिवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आम्ही देवस्थाने सुरू करा या मागणीसाठी राज्यभर "दार उघड उद्धवा दार उघड" अशी आर्त हाक देत "घंटानाद आंदोलन" करणार आहोत. महाराष्ट्राची भाविक जनता, विविध धार्मिक-आध्यात्मिक संस्था,संघटना, विविध देवस्थानांचे विश्वस्त, विविध संप्रदाय तसेच महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असं आवाहन आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केलं आहे.
पावसाळी अधिवेशन: कोविड पॉझिटिव्ह आमदारांना विधिमंडळात प्रवेशबंदी
कहर सुरूच! दिवसभरात ३२९ रुग्णांचा मृत्यू; १२ हजार करोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज
या बैठकीला शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी अध्यक्ष अतुल भोसले, श्रीसिद्धिविनायक मंदिर समितीचे विश्वस्त सुमंत घैसास यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.