आदित्य ठाकरे यांची राज्यपालांकडे भूमिका
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील वनजमिनी आणि खारजमिनी बिल्डरांच्या ताब्यात जाऊ नयेत, तसेच मुंबईतील ‘आरे’मधील मेट्रो कारशेड अन्य जागी हलविण्यात यावी, या मागण्यांसाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे तसेच आमदार नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली.
आरे येथे अनेक वन्यजीव आढळले आहेत, त्यामुळे आरे वाचवणे गरजेचे आहे, अशी विनंती आदित्य यांनी केली. आरे कारशेड असेल किंवा गिरगावतून जाणारी मेट्रो असेल, तेथील स्थानिक लोकांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईतील पूर्व किनारपट्टीची जमीन ही मिल जमिनीच्या तीनपट मोठी आहे. या जागेवर जवळपास ८ मरिन ड्राइव्ह आणि ५० ओव्हल मैदाने मावतील एवढी ही जागा आहे. राज्य सरकारकडून या जमिनी प्रयत्नपूर्वक हरित पट्टा म्हणून विकसित केल्या जाऊ शकतात.
त्यामुळे व्यवसायिक आणि रहिवासी वापरासाठी या जमिनींचा वापर होऊ नये, यासाठी कडक धोरणे बनवली गेली पाहिजेत, अशीही मागणी आदित्य यांनी राज्यपालांकडे केली. या जमिनी बिल्डर लॉबीच्या घशात जाऊ नयेत, असेही मत त्यांनी यावेळी मांडले.
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील वनजमिनी आणि खारजमिनी बिल्डरांच्या ताब्यात जाऊ नयेत, तसेच मुंबईतील ‘आरे’मधील मेट्रो कारशेड अन्य जागी हलविण्यात यावी, या मागण्यांसाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे तसेच आमदार नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली.
आरे येथे अनेक वन्यजीव आढळले आहेत, त्यामुळे आरे वाचवणे गरजेचे आहे, अशी विनंती आदित्य यांनी केली. आरे कारशेड असेल किंवा गिरगावतून जाणारी मेट्रो असेल, तेथील स्थानिक लोकांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईतील पूर्व किनारपट्टीची जमीन ही मिल जमिनीच्या तीनपट मोठी आहे. या जागेवर जवळपास ८ मरिन ड्राइव्ह आणि ५० ओव्हल मैदाने मावतील एवढी ही जागा आहे. राज्य सरकारकडून या जमिनी प्रयत्नपूर्वक हरित पट्टा म्हणून विकसित केल्या जाऊ शकतात.
त्यामुळे व्यवसायिक आणि रहिवासी वापरासाठी या जमिनींचा वापर होऊ नये, यासाठी कडक धोरणे बनवली गेली पाहिजेत, अशीही मागणी आदित्य यांनी राज्यपालांकडे केली. या जमिनी बिल्डर लॉबीच्या घशात जाऊ नयेत, असेही मत त्यांनी यावेळी मांडले.