अ‍ॅपशहर

वाढत्या निकालामुळे प्रवेशासाठी ‘परीक्षा’

सीबीएसई बोर्डाच्या निकालाची वाढलेली टक्केवारी व अलिकडच्या काळातील राज्य शिक्षण मंडळाच्या निकालाचा वाढता टक्का, यामुळे यंदाही एफवायच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागणार आहे. प्रामुख्याने आवडत्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवणे जणू ‘परीक्षा’च ठरणार आहे.

Maharashtra Times 25 May 2016, 2:34 am
sourabh.sharma1@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम admission
वाढत्या निकालामुळे प्रवेशासाठी ‘परीक्षा’


मुंबई : सीबीएसई बोर्डाच्या निकालाची वाढलेली टक्केवारी व अलिकडच्या काळातील राज्य शिक्षण मंडळाच्या निकालाचा वाढता टक्का, यामुळे यंदाही एफवायच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागणार आहे. प्रामुख्याने आवडत्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवणे जणू ‘परीक्षा’च ठरणार आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) राज्याचा निकाल यंदा ९३.४७ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी दोनने वाढली आहे. यात मुंबईतील अनेक शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत, तर अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुणांची कमाई केली आहे. दरम्यान, मागील काही वर्षांत राज्य शिक्षण मंडळाच्या निकालाचा टक्काही वाढला आहे. परिणामी नामांकित कॉलेजांच्या प्रवेशासाठीची स्पर्धा कमालीची वाढली आहे.

सेल्फ फायनान्सला प्राधान्य

नुकत्याच जाहीर झालेल्या या निकालात जवळपास ४० टक्के विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यातील बरेच विद्यार्थ्यांचा कल सेल्फ फायनान्सकडे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवेशाची चुरस अधिकच वाडणार असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज