अ‍ॅपशहर

विद्यार्थ्यांना प्रवेशदिलासा!

निकाल गोंधळामुळे मुंबई विद्यापीठातील विभाग व संलग्नित कॉलेजांमध्ये पदव्युत्तर प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे अनेकांनी प्रशासनाकडे धाव घेत प्रवेशासाठी मुदतवाढ मागितली होती. याप्रकरणी सकारात्मक निर्णय घेत विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शनिवारी जाहीर केला. या मुदतवाढीतून ‘डीटीई’ आणि ‘डीएचई’मार्फत होणाऱ्या प्रवेशांना मात्र वगळण्यात आले आहे.

Maharashtra Times 17 Sep 2017, 2:46 am
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम admission releif for students
विद्यार्थ्यांना प्रवेशदिलासा!


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

निकाल गोंधळामुळे मुंबई विद्यापीठातील विभाग व संलग्नित कॉलेजांमध्ये पदव्युत्तर प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे अनेकांनी प्रशासनाकडे धाव घेत प्रवेशासाठी मुदतवाढ मागितली होती. याप्रकरणी सकारात्मक निर्णय घेत विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शनिवारी जाहीर केला. या मुदतवाढीतून ‘डीटीई’ आणि ‘डीएचई’मार्फत होणाऱ्या प्रवेशांना मात्र वगळण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या ऑनलाइन असेसमेंटच्या निर्णयामुळे निकालासाठी सप्टेंबर उजाडला. प्रत्यक्षात विद्यापीठ कायद्यानुसार ४० दिवसांत निकाल जाहीर होणे गरजेचे आहे. मात्र विद्यापीठाला ही अट पाळता आलेली नाही. सप्टेंबरचा तिसरा आठवडा आला तरी अद्याप सात निकालांची प्रतीक्षा कायम आहे. याचा थेट फटका पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला बसला

असून, अनेकांना प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. यासाठी काही दिवसांपासून अनेक विद्यार्थी संघटनांनीही विद्यापीठाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. याची दखल घेत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाने ही मुदतवाढ दिली आहे.

बीए, बी.कॉम, बीएससी आणि एलएलबीच्या निकालांमध्ये काही गोंधळ झाले आहेत. काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व शाखांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मुदतवाढ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्य तंत्रशिक्षण परिषदेमार्फेत घेण्यात येणाऱ्यांना इंजिनीअरिंग व फार्मसीच्या प्रवेशांना मात्र यातून वगळण्यात आले आहे.

प्रिंटआऊटद्वारे प्रवेश

मुदतवाढीची घोषणा करताना शनिवारी विद्यापीठ प्रशासनाने संलग्नित कॉलेज, उपकेंद्र आणि विभागप्रमुखांना परिपत्रक पाठविले आहे. गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत, मात्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाले असल्यास त्याची प्रिंटआऊट अथवा पदवी प्रमाणपत्राच्या गॅझेट कॉपीच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज