म. टा. प्रतिनिधी, मुंबई
यंदा ३९ नव्या कॉलेजांची भर पडल्याने अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठीच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या वाढीव जागांची संख्या चार हजार असण्याची शक्यता असून, मुंबई शिक्षण उपसंचालक विभाग येत्या दोन दिवसांत निश्चित आकडेवारी जाहीर करणार आहे.
मुंबई विभागातील अकरावीचे सर्व प्रवेश यंदा ऑनलाइन होणार आहेत. आर्टस, सायन्स आणि कॉमर्स या शाखांबरोबरच एमसीव्हीसीच्या अभ्यासक्रमांचे प्रवेशही यंदा ऑनलाइन होतील. गेल्यावर्षी अकरावीकरिता तिन्ही शाखा मिळून सर्व कोट्यानिहाय २ लाख ८० हजार ५०० जागा उपलब्ध होत्या.
वसई-विरार आणि ठाणे, नवी मुंबई या परिसरातून मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, स्वयंअर्थसहाय्य या माध्यमातून कायम विनाअनुदानित तत्त्वावरील कॉलेज तसेच विनाअनुदानित तुकड्या सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शिक्षण संचालकांकडे पाठवले होते. त्यानुसार या नव्या कॉलेजांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी अकरावीसाठी उपलब्ध कॉलेजांची संख्या ७३९वरून ७७८वर पोहोचली आहे. या नव्या कॉलेजांच्या मान्यतेमुळे अंदाजे चार हजार जागा वाढण्याची शक्यता शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी वर्तवली आहे.
दरम्यान, या वाढीव जागांमुळे शहरातील अनेक कॉलेजांच्या मुख्याध्यापकांची चिंताही वाढणार आहे. अनेक लहान ज्युनिअर कॉलेजांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी अकरावी प्रवेशाच्या सुमारे ५६ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदा हा आकडा कुठपर्यंत जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
यंदा ३९ नव्या कॉलेजांची भर पडल्याने अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठीच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या वाढीव जागांची संख्या चार हजार असण्याची शक्यता असून, मुंबई शिक्षण उपसंचालक विभाग येत्या दोन दिवसांत निश्चित आकडेवारी जाहीर करणार आहे.
मुंबई विभागातील अकरावीचे सर्व प्रवेश यंदा ऑनलाइन होणार आहेत. आर्टस, सायन्स आणि कॉमर्स या शाखांबरोबरच एमसीव्हीसीच्या अभ्यासक्रमांचे प्रवेशही यंदा ऑनलाइन होतील. गेल्यावर्षी अकरावीकरिता तिन्ही शाखा मिळून सर्व कोट्यानिहाय २ लाख ८० हजार ५०० जागा उपलब्ध होत्या.
वसई-विरार आणि ठाणे, नवी मुंबई या परिसरातून मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, स्वयंअर्थसहाय्य या माध्यमातून कायम विनाअनुदानित तत्त्वावरील कॉलेज तसेच विनाअनुदानित तुकड्या सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शिक्षण संचालकांकडे पाठवले होते. त्यानुसार या नव्या कॉलेजांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी अकरावीसाठी उपलब्ध कॉलेजांची संख्या ७३९वरून ७७८वर पोहोचली आहे. या नव्या कॉलेजांच्या मान्यतेमुळे अंदाजे चार हजार जागा वाढण्याची शक्यता शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी वर्तवली आहे.
दरम्यान, या वाढीव जागांमुळे शहरातील अनेक कॉलेजांच्या मुख्याध्यापकांची चिंताही वाढणार आहे. अनेक लहान ज्युनिअर कॉलेजांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी अकरावी प्रवेशाच्या सुमारे ५६ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदा हा आकडा कुठपर्यंत जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.