मुंबई: महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या २५ हजाराच्यावर गेली आहे. त्यामुळे गोवा मॉडलच्या धर्तीवर राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना रोखण्यासाठी गोवा मॉडलप्रमाणे काम करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी गोवा मॉडलवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्याएवढ्या असलेल्या गोव्यात प्रभावी उपाययोजना करून करोनाला रोखण्यात आले आहे. त्यामुळे आपणही गोव्याच्या धर्तीवर करोनाला रोखू शकतो. त्यासाठी घरोघरी जाऊन रुग्णांचा सर्व्हे करा आणि रुग्णांवर उपचार करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज्यातील काही जिल्ह्यात गोवा मॉडलची प्रभावी अंमलबजावणी करता येऊ शकते, असंही या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं समजतं.
...मग चंद्रकांत पाटील कोल्हापुरातून का लढले नाहीत: खडसे
तसेच चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये कोणत्या प्रकारची निर्बंध शिथिल करायची याचा तपशील लवकरात लवकर सादर करण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्याशिवाय जिल्ह्यांच्या सीमा न उघडण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. उद्या लॉकडाऊन पूर्णपणे उठवला तरी जिल्ह्यांच्या सीमा उघडायच्या नाहीत, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज्यात करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून कंटेन्मेंट झोनवर अधिक लक्ष देण्याच्या सूचना करतानाच घरोघरी जाऊन रुग्णांचं सर्व्हेक्षण केल्यास येत्या पावसाळ्यात त्याचा फायदाच होईल. त्यामुळे पावसाळ्याशी संबंधित आजारांची माहितीही मिळेल, असं त्यांनी सांगितलं.
पारधी कुटुंबातील तिघांची हत्या; बीड जिल्हा हादरला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी गोवा मॉडलवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्याएवढ्या असलेल्या गोव्यात प्रभावी उपाययोजना करून करोनाला रोखण्यात आले आहे. त्यामुळे आपणही गोव्याच्या धर्तीवर करोनाला रोखू शकतो. त्यासाठी घरोघरी जाऊन रुग्णांचा सर्व्हे करा आणि रुग्णांवर उपचार करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज्यातील काही जिल्ह्यात गोवा मॉडलची प्रभावी अंमलबजावणी करता येऊ शकते, असंही या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं समजतं.
...मग चंद्रकांत पाटील कोल्हापुरातून का लढले नाहीत: खडसे
तसेच चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये कोणत्या प्रकारची निर्बंध शिथिल करायची याचा तपशील लवकरात लवकर सादर करण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्याशिवाय जिल्ह्यांच्या सीमा न उघडण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. उद्या लॉकडाऊन पूर्णपणे उठवला तरी जिल्ह्यांच्या सीमा उघडायच्या नाहीत, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज्यात करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून कंटेन्मेंट झोनवर अधिक लक्ष देण्याच्या सूचना करतानाच घरोघरी जाऊन रुग्णांचं सर्व्हेक्षण केल्यास येत्या पावसाळ्यात त्याचा फायदाच होईल. त्यामुळे पावसाळ्याशी संबंधित आजारांची माहितीही मिळेल, असं त्यांनी सांगितलं.
पारधी कुटुंबातील तिघांची हत्या; बीड जिल्हा हादरला