अ‍ॅपशहर

आंबेडकरांचा कालचा अंदाज अखेर खरा ठरला!

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काल एका पत्रकार परिषदेत वर्तवलेला अंदाज आज अखेर खरा ठरला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्ता स्थापनेसाठी जोर बैठका सुरू आहे. सत्तेसाठी महाविकासआघाडी तयार होत आहे. परंतु, यात शिवसेनेचा पोपट होऊ नये एवढीच इच्छा आहे, असे वक्तव्य काल अकोल्यात आंबेडकरांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2019, 2:50 pm

'असं राजकारण खूप पाहिलंय; भाजप यशस्वी होणार नाही'

मुंबईः वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काल एका पत्रकार परिषदेत वर्तवलेला अंदाज आज अखेर खरा ठरला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्ता स्थापनेसाठी जोर बैठका सुरू आहे. सत्तेसाठी महाविकासआघाडी तयार होत आहे. परंतु, यात शिवसेनेचा पोपट होऊ नये एवढीच इच्छा आहे, असे वक्तव्य काल अकोल्यात आंबेडकरांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ambedkar




अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली. गेल्या २६ दिवसांपासून राज्यात नाटक सुरू आहे. राष्ट्रवादी हा पक्ष बिनबुडाचा आहे. तो कोणत्याही बाजूने जाऊ शकतो. काँग्रेसनेही शिवसेनेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाहीतर मुख्यमंत्रिपदासाठी पुढाकार घेतलेल्या शिवसेनेचा पोपट होऊ नये म्हणजे झालं, असे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अॅड प्रकाश आंबेडकरांनी आघाडीत सहभागी होण्याऐवजी एकला चलो रे जाणे पसंत केले होते. त्यांच्या या निर्णयाचा काँग्रेस - राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. २५ ते ३० जागांवर आघाडीचे उमेदवार थोड्या मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. काँग्रेस - राष्ट्रवादीचे राजकारण हे विश्वासाचे नाही, असा आरोप आंबेडकरांनी याआधीच केलेला आहे.

केंद्राचा महाराष्ट्रावर फर्जिकल स्ट्राइक: उद्धव

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षाचं सरकार अस्तित्वात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असताना आज सकाळी भाजपने राजकीय सर्जिकल स्ट्राइक लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज राजभवनात राज्यपालांनी या दोन्ही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीतील २२ आमदारांचा पाठींबा असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, त्यांना किती आमदारांचा पाठींबा आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. शरद पवार यांनी अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केल्याने राज्याच्या राजकारणात आणखी नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.

'हे' सरकार ७ दिवस टिकणार नाहीः मलिक

वेळकाढूपणा नडला; काँग्रेसचे आमदार खवळले!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज