मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
'ऐ दिल है मुश्किल' च्या निमित्ताने अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी मनसेच्या 'सोयीस्कर' राजकारणावर टीका केली आहे आणि त्यासाठी मनसेची आंदोलने, माघार, अळीमिळी गुपचिळीचा तारखांसह पाढा वाचला आहे.
या घटनाक्रमानंतर शेवटी एक सल व्यक्त केला आहे की, आपण भारतीय नागरिक म्हणून आपले मतभेद बाजुला ठेवून भारताला कला आणि खेळाच्या वर ठेवू शकतो. पण आपले नेते भारताला राजकारणाच्या वर ठेवू शकतात का? मला वाटत नाही. ते जे भाषण देतात, ते कृतीत आणत नाहीत.
रेणुका शहाणे यांच्या पोस्टमधील सुरुवातीचा भाग :
काही घटनाक्रम केवळ त्यांच्यासाठी ज्यांचा स्मरणशक्ती क्षीण आहे -
३ फेब्रुवारी २००८: मनसेने मुंबईत उत्तर भारतीयांना लक्ष्य केल्यावर जया बच्चन यांनी विचारले, 'कोण आहे राज ठाकरे?'
८ सप्टेंबर २००८: अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राऐवजी उत्तर प्रदेशात मुलींची शाळा काढली. त्यांना उत्तर प्रदेशचे ब्रॅंड अॅम्बेसेडर केले. यावर मनसेने बच्चन यांच्यावर टीका केली. एका म्युझिक लॉंचच्या कार्यक्रमात जया बच्चन यांनी हिंदीत बोलण्यावरून व्यंगात्मक टिप्पणी केली, त्यानंतर मनसेने अमिताभ बच्चन यांच्या 'द लास्ट लिअर' विरोधात खळ्ळ खट्याक सुरू केले, तेव्हा जया बच्चन यांना राज ठाकरे कोण आहेत हे कळले आणि त्यांनी आपल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली.
ऑक्टोबर २०१६: अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी स्वत: काढलेले चित्र भेट दिले. बच्चन यांनी राज ठाकरेंना घड्याळ भेट दिलं. नंतर अमिताभ बच्चन गुजरातचे ब्रॅंड अॅम्बेसेडर बनले. तेव्हा मनसेने विरोध केला नाही.
मराठी-गुजराथी भाई-भाई पण युपी-मराठी भाई-भाई नाहीत.
ऑक्टोबर २००९: 'वेक अप सिड' मध्ये 'मुंबई' ऐवजी 'बॉम्बे' शब्द वापरल्याने मनसेचे आंदोलन. करण जोहरने यावर माफी मागितली. मनसेने आंदोलन मागे घेतले.
कट टू
सप्टेंबर २०१६: 'ऐ दिल है मुश्किल' मध्ये पाकिस्तानी अभिनेत्याला भूमिका देण्यावरून मनसेने विरोध सुरू केला. उरी हल्ल्यात आपले अनेक जवान शहिद झाल्यानंतर हा विरोध केला.
फ्लॅशबॅक:
२६-११-२००८: मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अनेक नागरिकांना ठार केले. पोलिस शहीद झाले. त्यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकार, गायक, लेखक आले, इथे काम केलं आणि गेले.
२ जानेवारी २०१६: पठाणकोट हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले.
मार्च २०१६: 'कपूर अॅंड सन्स' प्रदर्शित झाला. यातही फवाद खान होता. तेव्हा मनसेने विरोध केला नाही.
आता:
१८-१०-२०१६: करण जोहरने माफी मागितली. यापुढे पाकिस्तानी कलाकारांना भूमिका देणार नसल्याचे स्पष्ट केले. आपले गृहमंत्री म्हणाले, अन्य उद्योगांसारखाच सिनेमा एक उद्योग आहे. सरकारकडून पाकिस्तानी कलाकारांना कोणतीही बंदी नसेल. मनसेने सरकारच्या निर्णयाचा विरोध केला नाही. करण जोहर आज गृहमंत्र्यांना भेटणार आहे.
फ्लॅश फॉरवर्ड:
करण जोहरला राज ठाकरे स्वत: काढलेले चित्र भेट देणार?
'ऐ दिल है मुश्किल' च्या निमित्ताने अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी मनसेच्या 'सोयीस्कर' राजकारणावर टीका केली आहे आणि त्यासाठी मनसेची आंदोलने, माघार, अळीमिळी गुपचिळीचा तारखांसह पाढा वाचला आहे.
या घटनाक्रमानंतर शेवटी एक सल व्यक्त केला आहे की, आपण भारतीय नागरिक म्हणून आपले मतभेद बाजुला ठेवून भारताला कला आणि खेळाच्या वर ठेवू शकतो. पण आपले नेते भारताला राजकारणाच्या वर ठेवू शकतात का? मला वाटत नाही. ते जे भाषण देतात, ते कृतीत आणत नाहीत.
रेणुका शहाणे यांच्या पोस्टमधील सुरुवातीचा भाग :
काही घटनाक्रम केवळ त्यांच्यासाठी ज्यांचा स्मरणशक्ती क्षीण आहे -
३ फेब्रुवारी २००८: मनसेने मुंबईत उत्तर भारतीयांना लक्ष्य केल्यावर जया बच्चन यांनी विचारले, 'कोण आहे राज ठाकरे?'
८ सप्टेंबर २००८: अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राऐवजी उत्तर प्रदेशात मुलींची शाळा काढली. त्यांना उत्तर प्रदेशचे ब्रॅंड अॅम्बेसेडर केले. यावर मनसेने बच्चन यांच्यावर टीका केली. एका म्युझिक लॉंचच्या कार्यक्रमात जया बच्चन यांनी हिंदीत बोलण्यावरून व्यंगात्मक टिप्पणी केली, त्यानंतर मनसेने अमिताभ बच्चन यांच्या 'द लास्ट लिअर' विरोधात खळ्ळ खट्याक सुरू केले, तेव्हा जया बच्चन यांना राज ठाकरे कोण आहेत हे कळले आणि त्यांनी आपल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली.
ऑक्टोबर २०१६: अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी स्वत: काढलेले चित्र भेट दिले. बच्चन यांनी राज ठाकरेंना घड्याळ भेट दिलं. नंतर अमिताभ बच्चन गुजरातचे ब्रॅंड अॅम्बेसेडर बनले. तेव्हा मनसेने विरोध केला नाही.
मराठी-गुजराथी भाई-भाई पण युपी-मराठी भाई-भाई नाहीत.
ऑक्टोबर २००९: 'वेक अप सिड' मध्ये 'मुंबई' ऐवजी 'बॉम्बे' शब्द वापरल्याने मनसेचे आंदोलन. करण जोहरने यावर माफी मागितली. मनसेने आंदोलन मागे घेतले.
कट टू
सप्टेंबर २०१६: 'ऐ दिल है मुश्किल' मध्ये पाकिस्तानी अभिनेत्याला भूमिका देण्यावरून मनसेने विरोध सुरू केला. उरी हल्ल्यात आपले अनेक जवान शहिद झाल्यानंतर हा विरोध केला.
फ्लॅशबॅक:
२६-११-२००८: मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अनेक नागरिकांना ठार केले. पोलिस शहीद झाले. त्यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकार, गायक, लेखक आले, इथे काम केलं आणि गेले.
२ जानेवारी २०१६: पठाणकोट हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले.
मार्च २०१६: 'कपूर अॅंड सन्स' प्रदर्शित झाला. यातही फवाद खान होता. तेव्हा मनसेने विरोध केला नाही.
आता:
१८-१०-२०१६: करण जोहरने माफी मागितली. यापुढे पाकिस्तानी कलाकारांना भूमिका देणार नसल्याचे स्पष्ट केले. आपले गृहमंत्री म्हणाले, अन्य उद्योगांसारखाच सिनेमा एक उद्योग आहे. सरकारकडून पाकिस्तानी कलाकारांना कोणतीही बंदी नसेल. मनसेने सरकारच्या निर्णयाचा विरोध केला नाही. करण जोहर आज गृहमंत्र्यांना भेटणार आहे.
फ्लॅश फॉरवर्ड:
करण जोहरला राज ठाकरे स्वत: काढलेले चित्र भेट देणार?