मुंबई: भारताचा २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील विकास दर उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला दिलेले हे 'रिटर्न गिफ्ट' आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. ( Jayant Patil Slams Modi Government ) वाचा: नेमकं चाललंय काय? पवार भेटीनंतर फडणवीस पोहोचले खडसेंच्या घरी
भारताच्या विकास दराबाबत जयंत पाटील यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'मोदी सरकारचे करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसले नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव आवाक्याबाहेर गेले आहेत. त्याचवेळी देशाचा जीडीपी मायनसमध्ये आला आहे. महागाईचा तर भडकाच उडाला आहे. मोदी सरकारने जनतेला या रूपात एकप्रकारे रिटर्न गिफ्टच दिले आहे', असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
वाचा: 'आदित्य ठाकरेंसाठी मुलगी बघायलाही उद्या हे केंद्र सरकारलाच सांगतील'
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या ४० वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली आहे. करोनाच्या संकटाने मोठा तडाखा बसलेल्या भारताचा २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील विकासदर (सकल राष्ट्रीय उत्पादन) उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेला आहे. चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९७९-८० या वर्षांत आर्थिक विकासदराची उणे ५.२ टक्के घसरण झाली होती. त्यानंतर प्रथमच विकास दर उणे ७.३ टक्क्यांवर घसरला आहे. त्यावरच बोट ठेवत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.
वाचा: मुंबई लोकल कधी सुरू होणार? महापौरांचं महत्त्वाचं विधान
भारताच्या विकास दराबाबत जयंत पाटील यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'मोदी सरकारचे करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसले नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव आवाक्याबाहेर गेले आहेत. त्याचवेळी देशाचा जीडीपी मायनसमध्ये आला आहे. महागाईचा तर भडकाच उडाला आहे. मोदी सरकारने जनतेला या रूपात एकप्रकारे रिटर्न गिफ्टच दिले आहे', असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
वाचा: 'आदित्य ठाकरेंसाठी मुलगी बघायलाही उद्या हे केंद्र सरकारलाच सांगतील'
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या ४० वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली आहे. करोनाच्या संकटाने मोठा तडाखा बसलेल्या भारताचा २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील विकासदर (सकल राष्ट्रीय उत्पादन) उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेला आहे. चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९७९-८० या वर्षांत आर्थिक विकासदराची उणे ५.२ टक्के घसरण झाली होती. त्यानंतर प्रथमच विकास दर उणे ७.३ टक्क्यांवर घसरला आहे. त्यावरच बोट ठेवत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.
वाचा: मुंबई लोकल कधी सुरू होणार? महापौरांचं महत्त्वाचं विधान