Sameer.karve@timesgroup.com
मुंबई: देश-विदेशातील सुमारे ८४ स्थळांना विमानसेवा पुरविणा-या एअर इंडिया या राष्ट्रीय विमान कंपनीचा कारभार आता कागदविरहित व पर्यावरणस्नेही होण्याच्या मार्गावर आहे. एअर इंडियाच्या ९६ स्टेशन्सवरील कार्यालयांचा कारभार पेपरलेस होणार असून त्यासाठी कार्यालयांमध्ये डॉक्युमेन्ट मॅनेजमेन्ट सिस्टिम ही नवी डिजिटायजेशन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
इंधनबचत, स्वच्छता, खतनिर्मिती, सौरऊर्जा अशा विविध प्रकल्पांतून पर्यावरणस्नेही उपक्रम हाती घेण्यास एअर इंडियाने सुरुवात केली आहे. विमानांच्या उड्डाणासंबंधीच्या अनेक कागदपत्रांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून व जबाबदारीनिश्चितीसाठी वैमानिक व संबंधित कर्मचारी यांची स्वाक्षरी गरजेची असते. त्यावर विमानवाहतूक नियामक या नात्याने डीजीसीएचा अंकुश असतो. त्यामुळे सध्या तरी फ्लाइट डेटासंबंधीच्या कागदपत्रांचे डिजिटायजेशन शक्य नाही. परंतु इतर कार्यालयांमध्येही बराचसा कारभार कागदपत्रकेंद्री आहे व जेमतेम २० ते ३० टक्केच डिजिटायजेशन झाले आहे. एअर इंडियाने यंदा पर्यावरण सप्ताह जूनमध्ये साजरा केला व त्याअंतर्गत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचा भाग म्हणून एअर इंडियाच्या ९६ स्टेशन कार्यालयांचा कारभार ऑनलाइन करण्यात येत आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या सुरक्षा व पर्यावरणसंवर्धन विभागाच्या प्रमुख हरप्रीत सिंग यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली. प्रत्येक कार्यालयामध्ये डीजीसीए मॅन्युअल, आयाटा मॅन्युअल अशी मॅन्युअल्सची संख्याच ८० च्या घरात असते, शिवाय कार्यालयीन कामकाजाच्या फाइल्स मोठ्या असतात. हे सर्व कामकाज ऑनलाइन उपलब्ध व्हावे, याकरिता आयबीएमची मदत घेण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकारी धोरणानुसार २५ वर्षांपर्यंतच्या कागदपत्रांची विल्हेवाट लावता येत नाही. विल्हेवाट लावतानाही त्यांचे त्यांच्या महत्त्वानुसार वर्गीकरण करावे लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ असते. त्यासाठीच आता कागदपत्रांचे डिजिटायजेशन करण्याच्या कामास वेग देण्यात येईल, ज्यायोगे कागदपत्रांच्या विल्हेवाटीविषयी निर्णय घेता येईल, असे हरप्रीत म्हणाल्या.
जुनीपुराणी कागदपत्रे त्यातील गोपनीयता व सुरक्षिततेच्या दृष्टीने रद्दीवाल्यास देता येत नाहीत. त्यामुळे त्यांचे श्रेडिंग (कपटे) करून ते खतनिर्मितीसाठी वापरता येईल, असा सल्ला पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे. एअर इंडियाच्या कलिना येथील जुन्या विमानतळ परिसरातील कार्यालयात सोमवारी जैविक कच-यापासून खतनिर्मितीविषयी एक कार्यसत्र घेण्यात आले व आता प्रत्येक कार्यालयात १० स्वयंसेवक निवडून त्यांना पर्यावरणसंवर्धनाचे दूत बनविण्यात येणार आहे.
पर्यावरणरक्षणासंदर्भात एअर इंडियाने इंधनबचतीवर भर दिला आहे. त्यासाठी सुरक्षेशी तडजोड न करता वैमानिकांनी अधिक इंधन विमानात नेले असल्यास त्यांच्याकडे वरचेवर विचारणा करण्यात येते. ग्राऊन्ड हँडलिंगसाठी बॅटरीवर चालणारी वाहने आणण्यात आली आहेत. दिल्लीमध्ये सौरऊर्जेचे पॅनल बसविण्यात आले आहे. एकूणच या सर्व आघाड्यांवर अधिक काय करता येईल, हे जाणून घेण्यासाठी नागरी हवाई उड्डाण मंत्रालय, आयाटा, हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली आहे, असे हरप्रीत म्हणाल्या.
मुंबई: देश-विदेशातील सुमारे ८४ स्थळांना विमानसेवा पुरविणा-या एअर इंडिया या राष्ट्रीय विमान कंपनीचा कारभार आता कागदविरहित व पर्यावरणस्नेही होण्याच्या मार्गावर आहे. एअर इंडियाच्या ९६ स्टेशन्सवरील कार्यालयांचा कारभार पेपरलेस होणार असून त्यासाठी कार्यालयांमध्ये डॉक्युमेन्ट मॅनेजमेन्ट सिस्टिम ही नवी डिजिटायजेशन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
इंधनबचत, स्वच्छता, खतनिर्मिती, सौरऊर्जा अशा विविध प्रकल्पांतून पर्यावरणस्नेही उपक्रम हाती घेण्यास एअर इंडियाने सुरुवात केली आहे. विमानांच्या उड्डाणासंबंधीच्या अनेक कागदपत्रांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून व जबाबदारीनिश्चितीसाठी वैमानिक व संबंधित कर्मचारी यांची स्वाक्षरी गरजेची असते. त्यावर विमानवाहतूक नियामक या नात्याने डीजीसीएचा अंकुश असतो. त्यामुळे सध्या तरी फ्लाइट डेटासंबंधीच्या कागदपत्रांचे डिजिटायजेशन शक्य नाही. परंतु इतर कार्यालयांमध्येही बराचसा कारभार कागदपत्रकेंद्री आहे व जेमतेम २० ते ३० टक्केच डिजिटायजेशन झाले आहे. एअर इंडियाने यंदा पर्यावरण सप्ताह जूनमध्ये साजरा केला व त्याअंतर्गत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचा भाग म्हणून एअर इंडियाच्या ९६ स्टेशन कार्यालयांचा कारभार ऑनलाइन करण्यात येत आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या सुरक्षा व पर्यावरणसंवर्धन विभागाच्या प्रमुख हरप्रीत सिंग यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली. प्रत्येक कार्यालयामध्ये डीजीसीए मॅन्युअल, आयाटा मॅन्युअल अशी मॅन्युअल्सची संख्याच ८० च्या घरात असते, शिवाय कार्यालयीन कामकाजाच्या फाइल्स मोठ्या असतात. हे सर्व कामकाज ऑनलाइन उपलब्ध व्हावे, याकरिता आयबीएमची मदत घेण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकारी धोरणानुसार २५ वर्षांपर्यंतच्या कागदपत्रांची विल्हेवाट लावता येत नाही. विल्हेवाट लावतानाही त्यांचे त्यांच्या महत्त्वानुसार वर्गीकरण करावे लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ असते. त्यासाठीच आता कागदपत्रांचे डिजिटायजेशन करण्याच्या कामास वेग देण्यात येईल, ज्यायोगे कागदपत्रांच्या विल्हेवाटीविषयी निर्णय घेता येईल, असे हरप्रीत म्हणाल्या.
जुनीपुराणी कागदपत्रे त्यातील गोपनीयता व सुरक्षिततेच्या दृष्टीने रद्दीवाल्यास देता येत नाहीत. त्यामुळे त्यांचे श्रेडिंग (कपटे) करून ते खतनिर्मितीसाठी वापरता येईल, असा सल्ला पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे. एअर इंडियाच्या कलिना येथील जुन्या विमानतळ परिसरातील कार्यालयात सोमवारी जैविक कच-यापासून खतनिर्मितीविषयी एक कार्यसत्र घेण्यात आले व आता प्रत्येक कार्यालयात १० स्वयंसेवक निवडून त्यांना पर्यावरणसंवर्धनाचे दूत बनविण्यात येणार आहे.
पर्यावरणरक्षणासंदर्भात एअर इंडियाने इंधनबचतीवर भर दिला आहे. त्यासाठी सुरक्षेशी तडजोड न करता वैमानिकांनी अधिक इंधन विमानात नेले असल्यास त्यांच्याकडे वरचेवर विचारणा करण्यात येते. ग्राऊन्ड हँडलिंगसाठी बॅटरीवर चालणारी वाहने आणण्यात आली आहेत. दिल्लीमध्ये सौरऊर्जेचे पॅनल बसविण्यात आले आहे. एकूणच या सर्व आघाड्यांवर अधिक काय करता येईल, हे जाणून घेण्यासाठी नागरी हवाई उड्डाण मंत्रालय, आयाटा, हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली आहे, असे हरप्रीत म्हणाल्या.