म.टा. प्रतिनिधी, मुंबई
'वंदे भारत' अभियानात सेवा देणाऱ्या वैमानिकांना एअर इंडियाने राजीनामा देण्यास सांगितले आहे. यासंदर्भात वैमानिकाच्या पत्नीने ऑनलाइन याचिका केली आहे. नागरिकांना त्या याचिकेवर समर्थन देण्याचे आवाहन सामाजिक माध्यमांवर केले जात आहे.
एअर इंडिया ही सरकारी कंपनी अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. त्यामुळे याआधीही कंपनीने काही वैमानिकांना नोटिस पाठवून राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर आता 'वंदे भारत' अभियानातील वैमानिकांबाबतही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. एअर इंडियाचे कॅप्टन शंतनू सांगिडवार यांच्या पत्नी शिवानी शाश्वत यांनी तसे ऑनलाइन याचिकेत म्हटले आहे.
या याचिकेनुसार, कॅप्टन सांगिडवार हे दहा वर्षांपासून एअर इंडियाचे वैमानिक आहेत. त्यांनी जानेवारी २०२० मध्ये कंपनीतील सेवेचा राजीनामा दिला होता. डीजीसीएच्या नियमानुसार, वैमानिकाचा नोटीस कालावधी हा सहा महिने असतो. त्यानुसार त्यांच्या सेवेचा अखेरचा दिवस १५ जुलै, २०२० होता. पण पुढे ३ मार्चला त्यांनी तो राजीनामा मागे घेतला. त्यानुसार राजीनामा दिल्यानंतरही ते सेवेत कायम होते. यादरम्यान करोना संकट आले व परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी 'वंदे भारत' अभियान सुरू झाले.
शिवानी यांच्यानुसार, वंदे भारतसाठी वैमानिकांनी अनेकदा १५-१५ तास उड्डाण केले व परदेशात अडकलेल्या भारतीयांना भारतात आणले. तसे असतानाही एअर इंडियाने जुलै महिन्यात वैमानिकांच्या वेतनात ७० टक्के कपात केली. ही स्थिती असतानाच एअर इंडियाने १३ ऑगस्टला कॅप्टन शंतनू यांना राजीनामा मान्य केल्याचे सांगितले. 'राजीनामा मंजूर करण्यात आला असून सेवा समाप्त होत आहे', असे अचानक सांगितले. कॅप्टन शंतनू यांच्यासह अन्य ५६ वैमानिकांना एअर इंडियाने अशाप्रकारे कामातून तात्काळ कमी केले आहे, असे शिवानी यांनी याचिकेत नमूद केले आहे.
याबाबत एअर इंडियाशी संपर्क साधला असता त्यांनी, 'याबाबत एअर इंडिया विचार करत आहे. परंतु अधिक प्रतिक्रिया देता येणार नाही', असे स्पष्ट केले.
'वंदे भारत' अभियानात सेवा देणाऱ्या वैमानिकांना एअर इंडियाने राजीनामा देण्यास सांगितले आहे. यासंदर्भात वैमानिकाच्या पत्नीने ऑनलाइन याचिका केली आहे. नागरिकांना त्या याचिकेवर समर्थन देण्याचे आवाहन सामाजिक माध्यमांवर केले जात आहे.
एअर इंडिया ही सरकारी कंपनी अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. त्यामुळे याआधीही कंपनीने काही वैमानिकांना नोटिस पाठवून राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर आता 'वंदे भारत' अभियानातील वैमानिकांबाबतही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. एअर इंडियाचे कॅप्टन शंतनू सांगिडवार यांच्या पत्नी शिवानी शाश्वत यांनी तसे ऑनलाइन याचिकेत म्हटले आहे.
या याचिकेनुसार, कॅप्टन सांगिडवार हे दहा वर्षांपासून एअर इंडियाचे वैमानिक आहेत. त्यांनी जानेवारी २०२० मध्ये कंपनीतील सेवेचा राजीनामा दिला होता. डीजीसीएच्या नियमानुसार, वैमानिकाचा नोटीस कालावधी हा सहा महिने असतो. त्यानुसार त्यांच्या सेवेचा अखेरचा दिवस १५ जुलै, २०२० होता. पण पुढे ३ मार्चला त्यांनी तो राजीनामा मागे घेतला. त्यानुसार राजीनामा दिल्यानंतरही ते सेवेत कायम होते. यादरम्यान करोना संकट आले व परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी 'वंदे भारत' अभियान सुरू झाले.
शिवानी यांच्यानुसार, वंदे भारतसाठी वैमानिकांनी अनेकदा १५-१५ तास उड्डाण केले व परदेशात अडकलेल्या भारतीयांना भारतात आणले. तसे असतानाही एअर इंडियाने जुलै महिन्यात वैमानिकांच्या वेतनात ७० टक्के कपात केली. ही स्थिती असतानाच एअर इंडियाने १३ ऑगस्टला कॅप्टन शंतनू यांना राजीनामा मान्य केल्याचे सांगितले. 'राजीनामा मंजूर करण्यात आला असून सेवा समाप्त होत आहे', असे अचानक सांगितले. कॅप्टन शंतनू यांच्यासह अन्य ५६ वैमानिकांना एअर इंडियाने अशाप्रकारे कामातून तात्काळ कमी केले आहे, असे शिवानी यांनी याचिकेत नमूद केले आहे.
याबाबत एअर इंडियाशी संपर्क साधला असता त्यांनी, 'याबाबत एअर इंडिया विचार करत आहे. परंतु अधिक प्रतिक्रिया देता येणार नाही', असे स्पष्ट केले.