म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईहून ग्वाल्हेरला जाणारे एअर इंडियाचे विमान प्रवाशांना कित्येक तास ताटकळत ठेवल्यानंतर अखेर रद्द करण्यात आले आणि ७० प्रवाशांना विन्मुख व्हावे लागले.
मुंबई-सुरत-मुंबई या मार्गावर प्रवास करणारे एटीआर ७२ हे छोटेखानी विमान आयत्यावेळी तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्याने पुढे ग्वाल्हेरला त्याच मार्गावर उड्डाण करणारे विमानही रद्द होण्याची वेळ आली होती. मात्र प्रवासीसंख्या मोठी असल्याने एअर इंडियाने एअरबस ३१९ विमान या मार्गावर उडवून प्रवाशांची सोय करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्नही एअर इंडियाच्या अंगलटच आला.
ग्वाल्हेरमध्ये हवामान प्रतिकूल असल्याने तेथे एअरबस ३१९ विमानाला उतरण्यास अनुकूल परिस्थिती नव्हती. एटीआर ७२ या छोट्या विमानास तेथे उतरता आले असते, मात्र विमान अचानक बदलावे लागल्याने परिस्थितीही पालटली. बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतरही प्रतिकूल हवामानात फरक पडत नसल्याने अखेर हे उड्डाण एअर इंडियाने रद्द केले. मात्र या सर्व प्रकारात तासभराहून अधिक काळ विमानातच बसून राहावे लागलेल्या प्रवाशांचा एकच गोंधळ सुरू झाला व अखेर त्यांना उतरावे लागले.
मुंबईहून ग्वाल्हेरला जाणारे एअर इंडियाचे विमान प्रवाशांना कित्येक तास ताटकळत ठेवल्यानंतर अखेर रद्द करण्यात आले आणि ७० प्रवाशांना विन्मुख व्हावे लागले.
मुंबई-सुरत-मुंबई या मार्गावर प्रवास करणारे एटीआर ७२ हे छोटेखानी विमान आयत्यावेळी तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्याने पुढे ग्वाल्हेरला त्याच मार्गावर उड्डाण करणारे विमानही रद्द होण्याची वेळ आली होती. मात्र प्रवासीसंख्या मोठी असल्याने एअर इंडियाने एअरबस ३१९ विमान या मार्गावर उडवून प्रवाशांची सोय करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्नही एअर इंडियाच्या अंगलटच आला.
ग्वाल्हेरमध्ये हवामान प्रतिकूल असल्याने तेथे एअरबस ३१९ विमानाला उतरण्यास अनुकूल परिस्थिती नव्हती. एटीआर ७२ या छोट्या विमानास तेथे उतरता आले असते, मात्र विमान अचानक बदलावे लागल्याने परिस्थितीही पालटली. बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतरही प्रतिकूल हवामानात फरक पडत नसल्याने अखेर हे उड्डाण एअर इंडियाने रद्द केले. मात्र या सर्व प्रकारात तासभराहून अधिक काळ विमानातच बसून राहावे लागलेल्या प्रवाशांचा एकच गोंधळ सुरू झाला व अखेर त्यांना उतरावे लागले.