मुंबई: गेल्या काही दिवसांतील राज्यातील सत्तासंघर्षानंतर रविवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. विधानसभेत आवाजी पद्धतीने घेण्यात आलेल्या मतदानात राहुल नार्वेकर यांनी १६४ मते मिळवत बाजी मारली. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. या अभिनंदन प्रस्तावावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक शैलीत केलेले भाषण चांगलाच चर्चेचा विषय ठरले. हे भाषण ऐकून अजितदादा नव्या विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन करत होते की त्यांना शालजोडीतील टोले लगावत होते, हा प्रश्न अनेकांना पडला.
कोणत्याही पक्षात गेल्यावर नेतृत्त्वाच्या जवळ जाणं हे राहुल नार्वेकर यांचे कौशल्य आहे. शिवसेनेत असताना ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी मला आपलंसं करुन टाकला. त्यानंतर भाजपमध्ये गेल्यावर राहुल नार्वेकर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाऊ लागले. आता एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांना आपलंस करुन घ्यावं, नाहीतर तुमचं काही खरं नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला. अजितदादांनी भाषणाच्या ओघात राहुल नार्वेकर कशाप्रकारे विविध राजकीय पक्षांचा प्रवास केला आहे, हेदेखील अप्रत्यक्षरित्या सूचित केले.
यावेळी अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांना इतक्या लहान वयात विधानसभेचे अध्यक्ष मिळाल्याच्या मुद्द्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही चिमटे काढले. भाजपमधील जुन्याजाणत्या नेते कार्यकर्त्यांसाठी ही आश्चर्यकारक बाब आहे. परंतु, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन साहेब जे तुम्हाला कोणाला जमलं नाही, ते आमच्या राहुल नार्वेकरांनी तीन वर्षांमध्ये करुन दाखवले. हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. या सभागृहात समोरच्या बाजूला पाहतो, तेव्हा मुळचे भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेले मान्यवर जास्त दिसतात. आमच्या मंडळींना बघून मला भाजपमधील मूळ मंडळींचं वाईट वाटतं. आज भाजपमध्ये पदावर असलेली मंडळी आमच्याकडून गेलेली आहेत. भाजपमधील मूळ मान्यवरांना बाजूला सारून ते पदावर बसले आहेत. पहिली लाईन बघितली तरच हे लक्षात येईल, अशी खोचक टीका अजित पवार यांनी केली.
कोणत्याही पक्षात गेल्यावर नेतृत्त्वाच्या जवळ जाणं हे राहुल नार्वेकर यांचे कौशल्य आहे. शिवसेनेत असताना ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी मला आपलंसं करुन टाकला. त्यानंतर भाजपमध्ये गेल्यावर राहुल नार्वेकर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाऊ लागले. आता एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांना आपलंस करुन घ्यावं, नाहीतर तुमचं काही खरं नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला. अजितदादांनी भाषणाच्या ओघात राहुल नार्वेकर कशाप्रकारे विविध राजकीय पक्षांचा प्रवास केला आहे, हेदेखील अप्रत्यक्षरित्या सूचित केले.
यावेळी अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांना इतक्या लहान वयात विधानसभेचे अध्यक्ष मिळाल्याच्या मुद्द्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही चिमटे काढले. भाजपमधील जुन्याजाणत्या नेते कार्यकर्त्यांसाठी ही आश्चर्यकारक बाब आहे. परंतु, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन साहेब जे तुम्हाला कोणाला जमलं नाही, ते आमच्या राहुल नार्वेकरांनी तीन वर्षांमध्ये करुन दाखवले. हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. या सभागृहात समोरच्या बाजूला पाहतो, तेव्हा मुळचे भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेले मान्यवर जास्त दिसतात. आमच्या मंडळींना बघून मला भाजपमधील मूळ मंडळींचं वाईट वाटतं. आज भाजपमध्ये पदावर असलेली मंडळी आमच्याकडून गेलेली आहेत. भाजपमधील मूळ मान्यवरांना बाजूला सारून ते पदावर बसले आहेत. पहिली लाईन बघितली तरच हे लक्षात येईल, अशी खोचक टीका अजित पवार यांनी केली.