मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मुंबईत पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी राज्यभरात तो कायम आहे. परिणामी राज्यातली बहुतांश धरणे भरली आहेत. अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याखालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना, खडकवासला, उजनी आदी धरणांच्या पाण्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून नदीत ११ हजार क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आली आहे. पुण्याच्या खडकवासला धरणातून २३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी सिंहगड रस्ता परिसरातल्या काही इमारतींमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. महापालिकेचे कर्मचारी, पोलीस या भागात तैनात करण्यात आले आहेत. नारायण पेठ आणि डेक्कनला जोडणारा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. परिणामी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.
अहमदनगरच्या प्रवरा नदीपात्रातील भंडारदरा धरणातून ५,६७३ क्युसेक्स, निळवंडे धरणातून १८,९७५ क्युसेक्स तर ओझर प्रकल्पातून ८,०३५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील धामणी धरणाचे ५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास धरण मिळून एकूण १८,८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत केला जात आहे. सोलापूरचं उजनी धरणही पूर्ण भरलं आहे. कोल्हापूरची दूधगंगा, राधानगरी, सांगलीचं वारणा ही धरणंही पूर्ण भरली आहेत.
मुंबईत पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी राज्यभरात तो कायम आहे. परिणामी राज्यातली बहुतांश धरणे भरली आहेत. अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याखालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना, खडकवासला, उजनी आदी धरणांच्या पाण्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून नदीत ११ हजार क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आली आहे. पुण्याच्या खडकवासला धरणातून २३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी सिंहगड रस्ता परिसरातल्या काही इमारतींमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. महापालिकेचे कर्मचारी, पोलीस या भागात तैनात करण्यात आले आहेत. नारायण पेठ आणि डेक्कनला जोडणारा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. परिणामी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.
अहमदनगरच्या प्रवरा नदीपात्रातील भंडारदरा धरणातून ५,६७३ क्युसेक्स, निळवंडे धरणातून १८,९७५ क्युसेक्स तर ओझर प्रकल्पातून ८,०३५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील धामणी धरणाचे ५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास धरण मिळून एकूण १८,८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत केला जात आहे. सोलापूरचं उजनी धरणही पूर्ण भरलं आहे. कोल्हापूरची दूधगंगा, राधानगरी, सांगलीचं वारणा ही धरणंही पूर्ण भरली आहेत.