अ‍ॅपशहर

जोरदार पावसामुळे राज्यातली धरणं ओव्हरफ्लो

मुंबईत पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी राज्यभरात तो कायम आहे. परिणामी राज्यातली बहुतांश धरणे भरली आहेत. अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याखालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना, खडकवासला, उजनी आदी धरणांच्या पाण्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Maharashtra Times 20 Sep 2017, 11:52 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम all major dams in maharashtra overflow after heavy rainfall
जोरदार पावसामुळे राज्यातली धरणं ओव्हरफ्लो


मुंबईत पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी राज्यभरात तो कायम आहे. परिणामी राज्यातली बहुतांश धरणे भरली आहेत. अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याखालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना, खडकवासला, उजनी आदी धरणांच्या पाण्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून नदीत ११ हजार क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आली आहे. पुण्याच्या खडकवासला धरणातून २३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी सिंहगड रस्ता परिसरातल्या काही इमारतींमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. महापालिकेचे कर्मचारी, पोलीस या भागात तैनात करण्यात आले आहेत. नारायण पेठ आणि डेक्कनला जोडणारा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. परिणामी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

अहमदनगरच्या प्रवरा नदीपात्रातील भंडारदरा धरणातून ५,६७३ क्युसेक्स, निळवंडे धरणातून १८,९७५ क्युसेक्स तर ओझर प्रकल्पातून ८,०३५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील धामणी धरणाचे ५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास धरण मिळून एकूण १८,८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत केला जात आहे. सोलापूरचं उजनी धरणही पूर्ण भरलं आहे. कोल्हापूरची दूधगंगा, राधानगरी, सांगलीचं वारणा ही धरणंही पूर्ण भरली आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज