मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी मनसेपुढे सर्व पर्याय खुले असून मनसेला कुणीही गृहित धरू नये, असे आज मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केले. महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे जो निर्णय घेईल तो मराठी माणसाच्या आणि मुंबईच्या हिताचाच असेल, असेही सरदेसाई यांनी पुढे नमूद केले.
मुंबईत महापौर शिवसेनेचा होणार की भाजपचा, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबईकरांनी या दोन्ही पक्षांच्या पारड्यात आपला कौल टाकला असला तरी स्पष्ट बहुमत एकाही पक्षाला दिलेलं नाही. त्यामुळेच अपक्ष आणि कमी संख्याबळ असलेल्या पक्षांचा भाव वधारला आहे. मनसेचे सात नगरसेवक पालिकेत निवडून आले असून मनसेची भूमिका महापौर निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना मुंबईचा पुढचा महापौर मराठीच होणार, असा विश्वास व्यक्त केला.
मनसे शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का, असे विचारले असता तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. प्रस्ताव आलाच तर त्याचा विचार केला जाईल, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. सध्या कुणाची काय गणितं चालू आहेत, हे आम्हाला माहित नाही. आमच्यासाठी आजतरी सर्व पर्याय खुले आहेत. राजकारणात आम्हाला कुणीही अस्पृश्य नाही आणि आम्ही कुणाच्या दावणीलाही बांधून घेणार नाही, असे सरदेसाई यांनी पुढे नमूद केले.
महापौरपदाच्या निवडणुकीवर राज ठाकरे योग्यवेळी बोलतील. अजून निवडणुकीला पाच दिवस बाकी आहेत. राजकारणात पाच दिवस हा कालावधी फार मोठा असतो. काहीही घडू शकतं, असं उत्तरही सरदेसाई यांनी एका प्रश्नावर दिलं.
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी मनसेपुढे सर्व पर्याय खुले असून मनसेला कुणीही गृहित धरू नये, असे आज मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केले. महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे जो निर्णय घेईल तो मराठी माणसाच्या आणि मुंबईच्या हिताचाच असेल, असेही सरदेसाई यांनी पुढे नमूद केले.
मुंबईत महापौर शिवसेनेचा होणार की भाजपचा, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबईकरांनी या दोन्ही पक्षांच्या पारड्यात आपला कौल टाकला असला तरी स्पष्ट बहुमत एकाही पक्षाला दिलेलं नाही. त्यामुळेच अपक्ष आणि कमी संख्याबळ असलेल्या पक्षांचा भाव वधारला आहे. मनसेचे सात नगरसेवक पालिकेत निवडून आले असून मनसेची भूमिका महापौर निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना मुंबईचा पुढचा महापौर मराठीच होणार, असा विश्वास व्यक्त केला.
मनसे शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का, असे विचारले असता तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. प्रस्ताव आलाच तर त्याचा विचार केला जाईल, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. सध्या कुणाची काय गणितं चालू आहेत, हे आम्हाला माहित नाही. आमच्यासाठी आजतरी सर्व पर्याय खुले आहेत. राजकारणात आम्हाला कुणीही अस्पृश्य नाही आणि आम्ही कुणाच्या दावणीलाही बांधून घेणार नाही, असे सरदेसाई यांनी पुढे नमूद केले.
महापौरपदाच्या निवडणुकीवर राज ठाकरे योग्यवेळी बोलतील. अजून निवडणुकीला पाच दिवस बाकी आहेत. राजकारणात पाच दिवस हा कालावधी फार मोठा असतो. काहीही घडू शकतं, असं उत्तरही सरदेसाई यांनी एका प्रश्नावर दिलं.