अ‍ॅपशहर

गोरक्षकांनी अतिरेक्यांशी सामना करावा: उद्धव

अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील स्वयंघोषित गोरक्षकांना चांगलेच फैलावर घेतले आहे. गोरक्षा वगैरे सगळं थोतांड आहे. गोरक्षकांमध्ये खरंच हिंमत असेल तर त्यांनी दहशतवाद्यांशी सामना करावा, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले.

Maharashtra Times 11 Jul 2017, 9:26 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amarnath yatra attack shivsena chief uddhav thackeray slams gorakshak and modi sarkar
गोरक्षकांनी अतिरेक्यांशी सामना करावा: उद्धव


अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील स्वयंघोषित गोरक्षकांना चांगलेच फैलावर घेतले आहे. गोरक्षा वगैरे सगळं थोतांड आहे. गोरक्षकांमध्ये खरंच हिंमत असेल तर त्यांनी दहशतवाद्यांशी सामना करावा, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले. दहशतवाद्यांच्या बॅगेत दारूगोळ्याऐवजी गोमांस असतं तर कदाचित एकही दहशतवादी जिवंत सुटला नसता, असा खोचक टोलाही उद्धव यांनी लगावला.

जी-२० देशांच्या परिषदेत दहशतवादाविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी १० कलमी 'अॅक्शन प्लान' ठेऊन सर्वांची वाहवा मिळवली. आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या या घडामोडींचा संदर्भ घेत उद्धव यांनी मोदींवर निशाणा साधला. काँग्रेसचं सरकार असताना अमरनाथ यात्रा सुरळीत झाली पण आज केंद्रात हिंदुत्ववादी सरकार असतानाही यात्रेवर हल्ला झाला आहे, असे उद्धव म्हणाले. तिकडे ट्रम्प वगैरे सगळ्यांनी एकत्र येऊन दहशतवादाविरोधात लढाई सुरू केली आहे. त्या सगळ्या राष्ट्राध्यक्षांनी हातात बंदुका घेऊन अमरनाथ यात्रामार्गावर उभं राहावं व यात्रेकरूंचं रक्षण करावं, असा उपरोधिक टोलाही उद्धव यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांपेक्षा देवावरच विश्वास!

देव पावतो की नाही हे मला माहित नाही. मात्र लोकांचा मुख्यमंत्री आणि मंत्र्यांपेक्षा देवावर अधिक विश्वास आहे. म्हणूनच मंत्रालयापेक्षा देवळात जास्त गर्दी असते, असा टोला उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. हिंदूंचे सण आणि उत्सवांवर सगळीकडून आक्रमणे होत आहेत. गणेशोत्सवातही विघ्ने आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ही विघ्ने मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही उद्धव यांनी राज्य सरकारला दिला. सायलेंस झोनसंदर्भात मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो पण यावर्षी भेटणार नाही, असेही उद्धव म्हणाले.

मुंबई शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी आणि मूर्तिकार यांची वांद्रे येथील रंगशारदा येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करत होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज