मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बांगड्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून फडणवीस आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात जुंपलेली असतानाच अमृता फडणवीस यांनी या वादात उडी घेतली आहे. अमृता फडणवीस यांनी आदित्य यांना रेशीम किड्याची उपमा देतानाच त्यांना उपहास काय कळणार? असा खोचक टोला लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करून आदित्य ठाकरे यांच्यावर ही टीका केली आहे. 'रेशीम किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशीम’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते,' अशी खोचक टीका करतानाच 'देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो,' असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे आता अमृता यांच्या टीकेवर शिवसेनेची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'देवेंद्रजी, बांगड्यांबद्दलची मानसिकता बदला'
आझाद मैदानात भाजपच्या आंदोलनावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही असं म्हटलं होतं’ त्याला आदित्य ठाकरे यांनी जोरदार आक्षेप घेत फडणवीसांवर टीका केली होती. 'देवेंद्र फडणवीसजी, सहसा मी प्रत्युत्तर देत नाही. कृपया बांगड्यांबाबतच्या विधानाबाबत माफी मागा. सर्वात शक्तिशाली असा महिलावर्ग बांगड्या परिधान करतो. राजकारण चालूच राहील, पण बांगड्यांबाबतची ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही,' अशी टीका आदित्य यांनी केली होती. त्याला फडणवीस यांनी स्वत: उत्तर देताना मी आधीच बोललो होतो, की बांगड्या घालण्याचं वक्तव्य कोणाला आवडणार नाही. त्यामुळे मी गप्प बसणार का, असं म्हटलं. परंतु, त्यांनी माझं भाषण पूर्ण ऐकलं असतं, तर असं वक्तव्य केलंच नसतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण होईल, याची कल्पना त्यांना होती, त्यामुळे या वादाला बगल देण्यासाठी त्यांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला, असा दावा केला होता.
आधी सावरकरांना भारतरत्न द्या; सेनेचा टोला
वाचा: सावरकरांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही: पवार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करून आदित्य ठाकरे यांच्यावर ही टीका केली आहे. 'रेशीम किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशीम’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते,' अशी खोचक टीका करतानाच 'देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो,' असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे आता अमृता यांच्या टीकेवर शिवसेनेची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'देवेंद्रजी, बांगड्यांबद्दलची मानसिकता बदला'
आझाद मैदानात भाजपच्या आंदोलनावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही असं म्हटलं होतं’ त्याला आदित्य ठाकरे यांनी जोरदार आक्षेप घेत फडणवीसांवर टीका केली होती. 'देवेंद्र फडणवीसजी, सहसा मी प्रत्युत्तर देत नाही. कृपया बांगड्यांबाबतच्या विधानाबाबत माफी मागा. सर्वात शक्तिशाली असा महिलावर्ग बांगड्या परिधान करतो. राजकारण चालूच राहील, पण बांगड्यांबाबतची ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही,' अशी टीका आदित्य यांनी केली होती. त्याला फडणवीस यांनी स्वत: उत्तर देताना मी आधीच बोललो होतो, की बांगड्या घालण्याचं वक्तव्य कोणाला आवडणार नाही. त्यामुळे मी गप्प बसणार का, असं म्हटलं. परंतु, त्यांनी माझं भाषण पूर्ण ऐकलं असतं, तर असं वक्तव्य केलंच नसतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण होईल, याची कल्पना त्यांना होती, त्यामुळे या वादाला बगल देण्यासाठी त्यांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला, असा दावा केला होता.
आधी सावरकरांना भारतरत्न द्या; सेनेचा टोला
वाचा: सावरकरांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही: पवार