अ‍ॅपशहर

अमृता फडणवीस यांच्याकडून अर्णब गोस्वामींची पाठराखण

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या अमृता फडणवीस यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर एक शेर ट्वीट केला आहे. (Amruta Fadnavis on Twitter)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Nov 2020, 5:26 pm
मुंबई: वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्यावर झालेल्या पोलीस कारवाईचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. भाजपच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला घेरलं आहे. राज्य सरकार आणीबाणीची मानसिकता घेऊन कारभार करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनीही ट्वीट केलं आहे. (Amruta Fadnavis on Twitter)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Amruta Fadnavis-Arnab Goswami


वाचा: हिशेब होणार, तोही व्याजासह; 'या' नेत्याचा ठाकरे सरकारला इशारा

अलिबाग पोलिसांनी आज सकाळी अर्णब यांना वरळीतील त्यांच्या घरातून अटक केली. त्यांना सध्या अलिबागला नेण्यात आलं आहे. गोस्वामी यांच्यावर झालेल्या कारवाईचा भाजपकडून निषेध केला जात आहे. राज्य सरकार सूड भावनेनं वागत असल्याची टीका होत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांनीही या पार्श्वभूमीवर ट्वीट केलं आहे. त्यांनी एक शेर ट्वीट केला आहे. त्यातून त्यांनी अर्णब यांचं कौतुक केलं आहे.

वाचा: अर्णब गोस्वामींच्या अटकेमुळे भाजपचे नेते संतापले!

'बहुत छाले है उसके पाओं में,
कम्बख़्त उसूलों पे चला होगा!... असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या माध्यमातून त्यांनी अर्णब यांची पाठराखण केली आहे. अर्णब गोस्वामी हे तत्वनिष्ठ आहेत. त्यामुळंच त्यांना सहन करावं लागत आहे,' असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सोबत #DeathofDemocracy असं हॅशटॅगही त्यांनी दिलं आहे.

वाचा: अर्णब गोस्वामींना अटक; संजय राऊत म्हणाले...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज