मुंबईः उत्तर प्रदेश आणि त्या पाठोपाठ बलरामपूर येथे झालेल्या सामूहिक बलात्कारांच्या घटनांवरून देशात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर घेरलं आहे.
'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्या राज्यांना सल्ले देत आहेत. त्यापेक्षा त्यांनी त्यांच्या राज्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करावे आणि जंगलराजवर कारवाई करावी,' असा सल्लाच अनिल देशमुख यांनी केला आहे.
हाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'!
अनिल देशमुख यांनी हाथसर घटनेतील पीडितेला ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच, 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांना शासन करावं. पण, फिल्म सिटीऐवजी गुंडापासून क्लिन सीटीवर आपण भर दिलात तर माता भगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल. युपीच्या निर्भयाला न्याय द्या,' अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.
पार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का? भाजपचा बोचरा सवाल
१९ वर्षांच्या पीडित दलित मुलीवर १४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चार हैवानांनी क्रूरपणे अत्याचार केले होते. आपलं कृत्य लपवण्यासाठी आणि मुलीनं काही बोलू नये यासाठी त्यांनी सामूहिक बलात्कारानंतर जीभ कापली होती, तसंच पाठीचा कणाही मोडला होता. ग्णालयात दाखल केल्यानंतर ही मुलगी तब्बल नऊ दिवस बेशुद्धावस्थेतच होती. गेले १५ दिवस ती मृत्यूशी झुंजच देत होती अखेर तिची ही लढाई अर्धवट राहिली.
'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्या राज्यांना सल्ले देत आहेत. त्यापेक्षा त्यांनी त्यांच्या राज्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करावे आणि जंगलराजवर कारवाई करावी,' असा सल्लाच अनिल देशमुख यांनी केला आहे.
हाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'!
अनिल देशमुख यांनी हाथसर घटनेतील पीडितेला ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच, 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांना शासन करावं. पण, फिल्म सिटीऐवजी गुंडापासून क्लिन सीटीवर आपण भर दिलात तर माता भगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल. युपीच्या निर्भयाला न्याय द्या,' अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.
पार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का? भाजपचा बोचरा सवाल
१९ वर्षांच्या पीडित दलित मुलीवर १४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चार हैवानांनी क्रूरपणे अत्याचार केले होते. आपलं कृत्य लपवण्यासाठी आणि मुलीनं काही बोलू नये यासाठी त्यांनी सामूहिक बलात्कारानंतर जीभ कापली होती, तसंच पाठीचा कणाही मोडला होता. ग्णालयात दाखल केल्यानंतर ही मुलगी तब्बल नऊ दिवस बेशुद्धावस्थेतच होती. गेले १५ दिवस ती मृत्यूशी झुंजच देत होती अखेर तिची ही लढाई अर्धवट राहिली.