अ‍ॅपशहर

पोलिस दलातील रणरागिणी; गृहमंत्र्यांनी पत्रातून मानले आभार

आज नवरात्रीचा नववा दिवस आहे, तो दिवस ज्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Oct 2020, 7:30 pm
मुंबईः सध्या देशभरात नवरात्रोत्वाची धामधुम पाहायला मिळतेय. नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा सण. पोलिस दलात रणरागिणीही अनेक कठिण प्रसंगावर मात करून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही नवरात्रीचं औचित्यसाधून पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांसाठी एक भावनिक पत्र लिहलं आहे. समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या तुम्हीदेखील पोलिस दलातील दुर्गा आहात, असं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anil deshmukh


आज नवरात्रीचा नववा दिवस आहे, तो दिवस ज्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाला. याचा दिवस दुर्गा मातेनं दानव महिषासुराला पराभूत करून जगाचं रक्षण केलं. जशी दुर्गामाता संकटाच्या काळी जनतेच्या रक्षणासाठी धावून येते, त्याचप्रमाणे समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या तुम्हीदेखील पोलिस दलाच्या दुर्गा आहात. कोविडच्या काळात समाजाचे रक्षण करण्याची आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी तुम्ही अतिशय जिकरीनं पार पाडली आहे, असं म्हणत अनिल देशमुख यांनी कौतुक केलं आहे.

मुंबईत पोलिसांवर हल्ला; संजय राऊत यांनी केली 'ही' मागणी


तुमचे कार्य पार पाडत असताना अनेक वेळा दोन भूमिका पार पाडाव्या लागतात. जेव्हा तुम्ही समाजातील असंख्य कुटुंबीयांची काळजी घेत असता तेव्हाच तुमच्या कुटुंबीयाची देखील काळजी घ्यावी लागते. तुम्ही या दोन्ही जबाबदाऱ्या खूप सक्षमतेनं पार पाडता हे आम्ही अनुभवतो आहे. पोलिस दलाचा कुटुंब प्रमुख म्हणून या राज्यासाठी तुम्ही करत असलेल्या सेवेबद्दल आमच्या सर्वांतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

विजयाच्या गुलालाची वर्षपूर्ती; रोहित पवारांनी वर्षभराच्या कामाचा हिशोबच मांडला

फडणवीसांनी शब्द पाळला; करोना उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांत दाखल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज