अ‍ॅपशहर

अंजली गायकवाड ठरली ‘सारेगमप लिटील चॅम्प’

‘सारेगमप लिटील-चॅम्प २०१७’ या हिंदी गाण्यांच्या रिअॅलिटी शोमध्ये विजेत कोण ठरेल, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. जयपूरमध्ये रंगलेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत अहमदनगरच्या अंजली गायकवाडने लिटील चॅम्पच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

Maharashtra Times 30 Oct 2017, 1:00 am
भट्टाचार्यसह विभागून म‌िळाला प्रथम क्रमांक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anjali gaikwad becomes the saregupam litil champ
अंजली गायकवाड ठरली ‘सारेगमप लिटील चॅम्प’


-अजय उभारे (कॉलेज क्लब रिपोर्टर)

‘सारेगमप लिटील-चॅम्प २०१७’ या हिंदी गाण्यांच्या रिअॅलिटी शोमध्ये विजेत कोण ठरेल, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. जयपूरमध्ये रंगलेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत अहमदनगरच्या अंजली गायकवाडने लिटील चॅम्पच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. सूरांच्या या स्पर्धेत अजंलीला तितक्याच तोलामोलाची टक्कर देणाऱ्या श्रेयान भट्टाचार्यबरोबर तिला पुरस्कार विभागून देण्यात आला.

गायिका नेहा कक्कर, गायक हिमेश रेशमिया आणि गायक जावेद अली यांनी या स्पर्धेत परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. देशातील विविध भागांतून निवडलेल्या हजारो गायकांमध्ये लिटील चॅम्प जिंकण्यासाठी स्पर्धा लागली होती. सलग आठ महिने चाललेल्या या स्पर्धेत परीक्षक आणि पाहुणे कलाकारांकडून देण्यात आलेली गाण्यांची विविध खडतर आव्हाने पार करत अंजली गायकवाड, श्रेयन भट्टाचार्य, शन्मुखप्रिया, धृन टिक्कू, वैष्णव गिरीश आणि सोनाक्षी कर यांची अंतिम सहा स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली. अतितटीच्या या स्पर्धेत शेवटी सर्वांचीच मने जिंकून घेतली ती अहमदनगरच्या अंजली गायकवाड आणि कोलकत्त्याचा श्रेयन भट्टाचार्य यांनी.

अंजली अहमदनगरच्या आनंद विद्यालयात इयत्ता सातवीत शिकते. तिचे वडील अंगद गायकवाड हेच तिचे संगीत गुरू आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांपासून अंजली त्यांच्याकडेच संगीताचे धडे घेत आहे. अंजलीच्या या यशामुळे वडील आणि गुरु या दोन्ही भूमिकांतील मला तिचा अभिमान वाटत असल्याची भावना अंगद गायकवाड यांनी व्यक्त केली.

स्वप्न साकार झाले : अंजली गायकवाड

‘सारेगमप लिटील-चॅम्प’ची अंतिम महाविजेते ठरलेल्या अंजली आणि श्रेयन यांना कार्यक्रमाच्या परीक्षकांच्या हस्ते गौरवण्यात आले. ‘या स्पर्धेतील माझ्या या यशामागे अनेकांचे आशीर्वाद आहेत. अंतिम विजेती म्हणून नाव घोषित झाल्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझा स्वतःवर आणि माझ्या मेहनतीवर विश्वास होता. स्पर्धेत आपण विजेत व्हावे, असे स्वप्न उराशी बाळगले होते, ते स्वप्न आता या विजयातून सत्यात उतरले आहे,’ असे अंजली गायकवाड हिने ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज