म. टा. प्रतिनिधी, मुंबई
सहकारी साखर कारखान्यांतील खासगीकरण आणि घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीत अनेक बड्या राजकिय नेत्यांच्या नावाचा उल्लेख अण्णांनी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. साखर कारखान्यांचे खासगीकरण आणि घोटाळ्याप्रकरणी अण्णांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने अण्णांना पोलिसात तक्रार करण्यास सांगितले होते. त्यानुसार अण्णा हजारेसह त्याचे वकिलांनी बुधवारी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली.
सहकारी साखर कारखान्यांतील खासगीकरण आणि घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीत अनेक बड्या राजकिय नेत्यांच्या नावाचा उल्लेख अण्णांनी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. साखर कारखान्यांचे खासगीकरण आणि घोटाळ्याप्रकरणी अण्णांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने अण्णांना पोलिसात तक्रार करण्यास सांगितले होते. त्यानुसार अण्णा हजारेसह त्याचे वकिलांनी बुधवारी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली.