मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर खडबडून जाग्या झालेल्या रेल्वे प्रशासनानं मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तीन स्टेशनांवर नवे पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हे पूल युद्धपातळीवर उभे राहावेत, या दृष्टिकोनातून त्यांनी या कामाची जबाबदारी भारतीय लष्कराकडेच सोपवली आहे.
एल्फिन्स्टन रोड, करी रोड आणि आंबिवली या तीन स्टेशनांवर नवे पादचारी पूल उभे करण्याची घोषणा आज रेल्वेमंत्री पियुष गोयल, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या तीनही पुलांचं काम ३१ जानेवारी २०१८ च्या आत करण्याचं लक्ष्य लष्करानं ठेवलं आहे.
एल्फिन्स्टन येथील पादचारी पूल बांधण्याचं काम ५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. पुलासाठी आवश्यक सामुग्री तयार केल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी या पुलाची पायाभरणी केली जाईल. पुढच्या १५ दिवसांत - म्हणजेच १५ जानेवारीपर्यंत हा पूल बांधून तयार होईल आणि ३१ जानेवारीपर्यंत उर्वरित सर्व छोटी-मोठी कामं संपवून तो प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
पूल बांधण्यासाठी निविदा मागवायच्या झाल्यास त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. हा वेळ वाचावा या हेतूने हे काम लष्कराच्या इंजिनीअरिंग विंगकडून केलं जाणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या महिन्यात - २९ सप्टेंबरच्या सकाळी एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनं देश हादरला होते. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या इतिहासातील ही सर्वात भीषण घटना होती. त्यात २३ प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. स्वाभाविकच, त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. या दुर्घटनेला काल एक महिना पूर्ण झाला. त्यानंतर आज रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी एल्फिन्स्टन पुलाची पाहणी केली. या पुलावरील भार हलका करण्यासाठी एल्फिन्स्टनला नवा पूल बांधण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. त्यासोबतच करी रोड आणि आंबिवली येथील वाढती गर्दी पाहता, तिथेही नवा पूल बांधण्यात येणार आहे.
मुंबईतील गर्दीच्या स्टेशनांवर पूल उभारण्याचं काम वेगानं व्हावं, यासाठी रेल्वे प्रशासन आणि लष्करी अभियंत्यांनी एकत्रित काम करण्याची सूचना मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी केली होती. त्याला रेल्वेमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांनी कालच हिरवा कंदील दिला होता. त्याबाबतची अधिकृत घोषणा आता झाली असून लष्कराच्या पथकानं तीन महिन्यात ही मोहीम फत्ते करण्याचा चंग बांधला आहे.
एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर खडबडून जाग्या झालेल्या रेल्वे प्रशासनानं मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तीन स्टेशनांवर नवे पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हे पूल युद्धपातळीवर उभे राहावेत, या दृष्टिकोनातून त्यांनी या कामाची जबाबदारी भारतीय लष्कराकडेच सोपवली आहे.
एल्फिन्स्टन रोड, करी रोड आणि आंबिवली या तीन स्टेशनांवर नवे पादचारी पूल उभे करण्याची घोषणा आज रेल्वेमंत्री पियुष गोयल, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या तीनही पुलांचं काम ३१ जानेवारी २०१८ च्या आत करण्याचं लक्ष्य लष्करानं ठेवलं आहे.
एल्फिन्स्टन येथील पादचारी पूल बांधण्याचं काम ५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. पुलासाठी आवश्यक सामुग्री तयार केल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी या पुलाची पायाभरणी केली जाईल. पुढच्या १५ दिवसांत - म्हणजेच १५ जानेवारीपर्यंत हा पूल बांधून तयार होईल आणि ३१ जानेवारीपर्यंत उर्वरित सर्व छोटी-मोठी कामं संपवून तो प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
पूल बांधण्यासाठी निविदा मागवायच्या झाल्यास त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. हा वेळ वाचावा या हेतूने हे काम लष्कराच्या इंजिनीअरिंग विंगकडून केलं जाणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या महिन्यात - २९ सप्टेंबरच्या सकाळी एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनं देश हादरला होते. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या इतिहासातील ही सर्वात भीषण घटना होती. त्यात २३ प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. स्वाभाविकच, त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. या दुर्घटनेला काल एक महिना पूर्ण झाला. त्यानंतर आज रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी एल्फिन्स्टन पुलाची पाहणी केली. या पुलावरील भार हलका करण्यासाठी एल्फिन्स्टनला नवा पूल बांधण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. त्यासोबतच करी रोड आणि आंबिवली येथील वाढती गर्दी पाहता, तिथेही नवा पूल बांधण्यात येणार आहे.
मुंबईतील गर्दीच्या स्टेशनांवर पूल उभारण्याचं काम वेगानं व्हावं, यासाठी रेल्वे प्रशासन आणि लष्करी अभियंत्यांनी एकत्रित काम करण्याची सूचना मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी केली होती. त्याला रेल्वेमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांनी कालच हिरवा कंदील दिला होता. त्याबाबतची अधिकृत घोषणा आता झाली असून लष्कराच्या पथकानं तीन महिन्यात ही मोहीम फत्ते करण्याचा चंग बांधला आहे.