मुंबई:
महाराष्ट्रात यंदाच्या पावसात आलेल्या पुरामुळे आतापर्यंत १४४ जण मृत्युमुखी पडले आहेत. जून २०१९ ते आतापर्यंत सरासरीच्या एकूण १०९ टक्के पाऊस झाला आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गेले आठवडाभर पुरामुळे हाहाकार उडाला आहे. कोल्हापुरातील २३९ तर सांगलीतील ९० गावांना पुराचा फटका बसला आहे. कोल्हापुरात सरासरीच्या १२४ टक्के तर सांगलीत सरासरीच्या २२३ टक्के पाऊस पडला आहे.
येथील शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्य सरकारने १५४ कोटी रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहेत. एनडीआरएफचे जवान, लष्कर, नौदल आणि प्रशासनामार्फत बचावकार्य सुरू आहे.
महाराष्ट्रात यंदाच्या पावसात आलेल्या पुरामुळे आतापर्यंत १४४ जण मृत्युमुखी पडले आहेत. जून २०१९ ते आतापर्यंत सरासरीच्या एकूण १०९ टक्के पाऊस झाला आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गेले आठवडाभर पुरामुळे हाहाकार उडाला आहे. कोल्हापुरातील २३९ तर सांगलीतील ९० गावांना पुराचा फटका बसला आहे. कोल्हापुरात सरासरीच्या १२४ टक्के तर सांगलीत सरासरीच्या २२३ टक्के पाऊस पडला आहे.
येथील शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्य सरकारने १५४ कोटी रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहेत. एनडीआरएफचे जवान, लष्कर, नौदल आणि प्रशासनामार्फत बचावकार्य सुरू आहे.