म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
हिंदी चित्रपटसृष्टीत मी किमान ३५ वर्षांपासून काम करत असून आतापर्यंत अनेक स्वप्ने पूर्ण झाली आणि आता मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्नही म्हाडामुळे पूर्ण झाले. मुंबईला स्वप्ननगरी म्हणतात, ते खरेच आहे. आज मी पुन्हा एकदा त्याचा अनुभव घेतला आहे, अशा उत्स्फूर्त भावना बॉलीवूड व टीव्ही क्षेत्रातील अभिनेता तेज सप्रू यांनी ‘मटा’कडे व्यक्त केल्या. त्यांच्याप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री छाया कदम, हेमांगी कवी व सुहास परांजपे यांनीही घराचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल अतीव आनंद व्यक्त केला.
म्हाडाच्या यंदाच्या सोडतीत अनेक प्रथतियश कलाकारांनी घरासाठी अर्ज भरले होते. त्यात अनेकांच्या पदरी निराशा आली. मात्र, या चार कलाकारांचा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला. सप्रू यांना पवईत उच्च उत्पन्न गटात, छाया यांना प्रतीक्षा नगरमध्ये मध्यम उत्पन्न गटात तर हेमांगी व सुहास यांना बोरिवली-जुने मागाठणे येथे मध्यम उत्पन्न गटात नंबर लागला.
सप्रू यांना सोडतीत नंबर लागल्याचे सांगितल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला. ‘यापूर्वी मी दोनदा सर्वसाधारण गटात अर्ज भरला होता. पण कलाकारांसाठी प्रवर्ग असल्याचे कळल्याने यंदा त्यात भरला. पवईसारख्या ठिकाणी घर लागल्याने तर मला एक मोठे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला आहे’, अशा उत्स्फूर्त भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सुहास परांजपे या १५ दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना रुग्णालयातही दाखल करावे लागले होते. त्यातच भावाकडून ही आनंदाची बातमी त्यांना समजली. ‘अशक्तपणा असल्याने मी कोणाचेच फोन घेत नव्हते. तशातच माझ्या दादाचा फोन आला आणि त्याने ही बातमी दिली. मी गेली पाच वर्षे म्हाडाचा अर्ज भरत होते. आता मला घर लागल्याने मंगळागौरीच्या पुजेचे फळ मिळाल्यासारखेच वाटतेय’, अशी भावना त्यांनी ‘मटा’कडे व्यक्त केली.
‘फँड्री’, ‘बुधिया सिंग बॉन टू रन’ अशा सिनेमांमधून झळकलेली अभिनेत्री छाया कदम हिला तर या स्वप्नपूर्तीने ‘आनंद गगनात मावेनासा’ झाला आहे. ‘मी सध्या सांताक्रूझमध्ये राहत आहे. हे घर माझ्या वडिलांचे आहे. इतर कुटुंबांप्रमाणे आमच्या कुटुंबातही घराविषयी वाद झाल्याने माझ्यासमोर निवासाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशात म्हाडा सोडतीत पहिल्यांदाच केलेला अर्ज यशस्वी झाल्याने प्रचंड आनंद होत आहे’, असे छायाने सांगितले.
हेमांगीची घालमेल
‘ती फुलराणी’, ‘ठष्ट’ अशी नाटके आणि विनोदी कार्यक्रमांत ठसा उमटवलेली अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या आयुष्यात आठ वर्षांनंतर अतीव आनंदाचा क्षण आलेला असतानाही तो तिला व्यक्त मात्र करता आला नाही. कारण दुर्दैवाने हेमांगीच्या मोठ्या बहिणीचे दहा दिवसांपूर्वीच निधन झाल्याने दशक्रिया विधी सुरू असतानाच तिला ही आनंदाची बातमी कळली. हेमांगी आठ वर्षांपासून म्हाडाच्या घरासाठी प्रयत्न करत होती. दोनेक वर्षांपूर्वी तिचे पती संदीप धुमाळ यांना घर लागलेही होते. परंतु, काही तांत्रिक कारणाने त्यांना त्यावर पाणी सोडावे लागले होते. तरीही हेमांगीने धीर न सोडता यंदा पुन्हा अर्ज भरले होते.
हिंदी चित्रपटसृष्टीत मी किमान ३५ वर्षांपासून काम करत असून आतापर्यंत अनेक स्वप्ने पूर्ण झाली आणि आता मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्नही म्हाडामुळे पूर्ण झाले. मुंबईला स्वप्ननगरी म्हणतात, ते खरेच आहे. आज मी पुन्हा एकदा त्याचा अनुभव घेतला आहे, अशा उत्स्फूर्त भावना बॉलीवूड व टीव्ही क्षेत्रातील अभिनेता तेज सप्रू यांनी ‘मटा’कडे व्यक्त केल्या. त्यांच्याप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री छाया कदम, हेमांगी कवी व सुहास परांजपे यांनीही घराचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल अतीव आनंद व्यक्त केला.
म्हाडाच्या यंदाच्या सोडतीत अनेक प्रथतियश कलाकारांनी घरासाठी अर्ज भरले होते. त्यात अनेकांच्या पदरी निराशा आली. मात्र, या चार कलाकारांचा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला. सप्रू यांना पवईत उच्च उत्पन्न गटात, छाया यांना प्रतीक्षा नगरमध्ये मध्यम उत्पन्न गटात तर हेमांगी व सुहास यांना बोरिवली-जुने मागाठणे येथे मध्यम उत्पन्न गटात नंबर लागला.
सप्रू यांना सोडतीत नंबर लागल्याचे सांगितल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला. ‘यापूर्वी मी दोनदा सर्वसाधारण गटात अर्ज भरला होता. पण कलाकारांसाठी प्रवर्ग असल्याचे कळल्याने यंदा त्यात भरला. पवईसारख्या ठिकाणी घर लागल्याने तर मला एक मोठे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला आहे’, अशा उत्स्फूर्त भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सुहास परांजपे या १५ दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना रुग्णालयातही दाखल करावे लागले होते. त्यातच भावाकडून ही आनंदाची बातमी त्यांना समजली. ‘अशक्तपणा असल्याने मी कोणाचेच फोन घेत नव्हते. तशातच माझ्या दादाचा फोन आला आणि त्याने ही बातमी दिली. मी गेली पाच वर्षे म्हाडाचा अर्ज भरत होते. आता मला घर लागल्याने मंगळागौरीच्या पुजेचे फळ मिळाल्यासारखेच वाटतेय’, अशी भावना त्यांनी ‘मटा’कडे व्यक्त केली.
‘फँड्री’, ‘बुधिया सिंग बॉन टू रन’ अशा सिनेमांमधून झळकलेली अभिनेत्री छाया कदम हिला तर या स्वप्नपूर्तीने ‘आनंद गगनात मावेनासा’ झाला आहे. ‘मी सध्या सांताक्रूझमध्ये राहत आहे. हे घर माझ्या वडिलांचे आहे. इतर कुटुंबांप्रमाणे आमच्या कुटुंबातही घराविषयी वाद झाल्याने माझ्यासमोर निवासाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशात म्हाडा सोडतीत पहिल्यांदाच केलेला अर्ज यशस्वी झाल्याने प्रचंड आनंद होत आहे’, असे छायाने सांगितले.
हेमांगीची घालमेल
‘ती फुलराणी’, ‘ठष्ट’ अशी नाटके आणि विनोदी कार्यक्रमांत ठसा उमटवलेली अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या आयुष्यात आठ वर्षांनंतर अतीव आनंदाचा क्षण आलेला असतानाही तो तिला व्यक्त मात्र करता आला नाही. कारण दुर्दैवाने हेमांगीच्या मोठ्या बहिणीचे दहा दिवसांपूर्वीच निधन झाल्याने दशक्रिया विधी सुरू असतानाच तिला ही आनंदाची बातमी कळली. हेमांगी आठ वर्षांपासून म्हाडाच्या घरासाठी प्रयत्न करत होती. दोनेक वर्षांपूर्वी तिचे पती संदीप धुमाळ यांना घर लागलेही होते. परंतु, काही तांत्रिक कारणाने त्यांना त्यावर पाणी सोडावे लागले होते. तरीही हेमांगीने धीर न सोडता यंदा पुन्हा अर्ज भरले होते.