मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) रोजच्या रोज नवनवी माहिती देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. 'समीर वानखेडे हे परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्याच कॅटेगरीतील अधिकारी आहेत,' असा आरोप मलिक यांनी केला आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं केलेल्या कारवाईवर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मलिक यांचे आरोप फेटाळताना वानखेडे यांनी आम्ही जनतेचे सेवक आहोत, असं म्हटलं होतं. त्यावर मलिक यांनी आज जोरदार पलटवार केला. 'परमबीर सिंग देखील जनतेचा सेवक होता. प्रदीप शर्मा हे सुद्धा जनतेचे सेवक होते. परंतु देशसेवा न करता ते दुसरेच धंदे करत होते. हा व्यक्ती देखील त्यातील आहे. हळूहळू या सगळ्याचा खुलासा करणार आहे, असं नवाब मलिक यांनी आज स्पष्ट केलं.
वाचा: मुंबई ड्रग्ज प्रकरणात भाजप नेत्याच्या मेहुण्याचा सहभाग; नवाब मलिक यांचा आणखी एक गौप्यस्फोट
'कलाकारांकडून यांनी पैसे घेतले आहेत. दोन ग्रॅम, चार ग्रॅमसाठी खटले भरण्यात आले. एनसीबी स्वत:ची कामं न करता स्थानिक पोलिसांची कामं करतेय. त्यांच्यापेक्षा आमच्या राज्य सरकारच्या नार्कोटिक्स विभागानं काल दिवसभरात मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्यात २० किलो ड्रग्ज पकडले आहेत. एनसीबीची कामं आमचा विभाग करतो आहे. जसजसे पुरावे हाती येतील, तसतशी यांची पोलखोल करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
समीर वानखेडे यांनी दोन लोकांना का सोडलं?
क्रूझवरील पार्टीतील कारवाई दरम्यान १० लोकांना पकडण्यात आलं होतं. मात्र, त्यातील दोन लोकांना सोडलं गेलं. त्याचं कारण ते भाजपशी संबंधित लोक होते. यातील एक भाजप नेत्याचा मेहुणा होता. त्याला का सोडण्यात आलं? समीर वानखेडे यांनी भाजपच्या कोणत्या नेत्यांच्या सांगण्यावरून सोडलं गेलं? समीर वानखेडे कोणाच्या संपर्कात होते? कोणा-कोणाशी बोलत होते?,' असा सवालही मलिक यांनी केला.
वाचा: लॉकडाउन हाल संपेनात! रस्ते बंद असल्याने रुग्णाला खांद्यावर नेण्याची वेळ
वाचा: मुंबई ड्रग्ज प्रकरणात भाजप नेत्याच्या मेहुण्याचा सहभाग; नवाब मलिक यांचा आणखी एक गौप्यस्फोट
'कलाकारांकडून यांनी पैसे घेतले आहेत. दोन ग्रॅम, चार ग्रॅमसाठी खटले भरण्यात आले. एनसीबी स्वत:ची कामं न करता स्थानिक पोलिसांची कामं करतेय. त्यांच्यापेक्षा आमच्या राज्य सरकारच्या नार्कोटिक्स विभागानं काल दिवसभरात मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्यात २० किलो ड्रग्ज पकडले आहेत. एनसीबीची कामं आमचा विभाग करतो आहे. जसजसे पुरावे हाती येतील, तसतशी यांची पोलखोल करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
समीर वानखेडे यांनी दोन लोकांना का सोडलं?
क्रूझवरील पार्टीतील कारवाई दरम्यान १० लोकांना पकडण्यात आलं होतं. मात्र, त्यातील दोन लोकांना सोडलं गेलं. त्याचं कारण ते भाजपशी संबंधित लोक होते. यातील एक भाजप नेत्याचा मेहुणा होता. त्याला का सोडण्यात आलं? समीर वानखेडे यांनी भाजपच्या कोणत्या नेत्यांच्या सांगण्यावरून सोडलं गेलं? समीर वानखेडे कोणाच्या संपर्कात होते? कोणा-कोणाशी बोलत होते?,' असा सवालही मलिक यांनी केला.
वाचा: लॉकडाउन हाल संपेनात! रस्ते बंद असल्याने रुग्णाला खांद्यावर नेण्याची वेळ