मुंबई: मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. या उपसमितीच्या अध्यक्षपदी चव्हाण यांची नियुक्ती केल्याने त्याला भाजप नेते आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी विरोध दर्शविला आहे. या उपसमितीच्या अध्यक्षपदावरून चव्हाण यांची हकालपट्टी करण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.
विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यांना प्रत्यक्षात नियुक्ती पत्र न देण्यात आल्याने संतापलेल्या मराठा तरुणांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाचा आज ३६वा दिवस आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आज या तरुणांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षतेपदावरून उचलबांगडी करण्याची मागणी केली. तसेच मराठा तरुणांच्या प्रश्नावरून संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकाही केली. गेल्या ३६ दिवसांपासून हे तरुण उपोषण करत आहेत. उद्या त्यांचं बरं वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असं सांगतानाच मराठा तरुणांच्या प्रश्नावर तोडगा निघत नसेल तर हे तरुण रस्त्यावर उतरल्यास त्याला सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल असा इशारा संभाजीराजे यांनी दिला.
दरम्यान, आज दुपारी २ वाजता मंत्रालयात बैठक होती. मात्र २ वाजता विधानसभेत लक्ष्यवेधी असल्याने ही बैठक ५ वाजता होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. सारथीच्या मुद्द्यावर बोलताना माझा अवमान कोणीही करू शकणार नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात जन्माला आलो त्याचा मला अभिमानच आहे, असंही त्यांनी सांगितलं. सारथी संस्थेसंदर्भात दुपारी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
जातीवाचक शिवीगाळ; माजी आमदारावर गुन्हा
काँग्रेसकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यांना प्रत्यक्षात नियुक्ती पत्र न देण्यात आल्याने संतापलेल्या मराठा तरुणांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाचा आज ३६वा दिवस आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आज या तरुणांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षतेपदावरून उचलबांगडी करण्याची मागणी केली. तसेच मराठा तरुणांच्या प्रश्नावरून संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकाही केली. गेल्या ३६ दिवसांपासून हे तरुण उपोषण करत आहेत. उद्या त्यांचं बरं वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असं सांगतानाच मराठा तरुणांच्या प्रश्नावर तोडगा निघत नसेल तर हे तरुण रस्त्यावर उतरल्यास त्याला सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल असा इशारा संभाजीराजे यांनी दिला.
दरम्यान, आज दुपारी २ वाजता मंत्रालयात बैठक होती. मात्र २ वाजता विधानसभेत लक्ष्यवेधी असल्याने ही बैठक ५ वाजता होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. सारथीच्या मुद्द्यावर बोलताना माझा अवमान कोणीही करू शकणार नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात जन्माला आलो त्याचा मला अभिमानच आहे, असंही त्यांनी सांगितलं. सारथी संस्थेसंदर्भात दुपारी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
जातीवाचक शिवीगाळ; माजी आमदारावर गुन्हा
काँग्रेसकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी