अ‍ॅपशहर

औरंगाबाद अपघात: '४ आठवड्यांत अहवाल सादर करा'

औरंगाबादमधील रेल्वे अपघातात १६ मजूर ठार झाले. या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं गंभीर दखल घेऊन राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. चार आठवड्यांत सविस्तर अहवाल द्या, असा आदेशही आयोगानं दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 May 2020, 10:17 pm
मुंबई: औरंगाबादमधील बदनापूर-करमाड दरम्यान रेल्वे अपघातात १६ मजूर ठार झाल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून, चार आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश आयोगाने दिले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad accident


बदनापूर ते करमाडदरम्यान आज पहाटेच्या सुमारास एका मालगाडीखाली चिरडून १६ स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला. गावाकडे जाणारी गाडी पकडण्यासाठी रेल्वे रुळांवरून निघाले होते. रात्र झाल्यामुळं सटाणा शिवाराजवळ रेल्वे रुळावरच ते झोपी गेले होते. त्याचवेळी मालगाडीखाली ते चिरडले गेले. या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली असून, राज्याचे मुख्य सचिव आणि औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. चार आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश आयोगानं दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात गरिबांना, विशेषतः स्थलांतरित मजुरांना राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून अन्न, निवारा आणि इतर पायाभूत सुविधा देण्यासाठी काय पावलं उचलण्यात आली, याची माहितीही या अहवालात देण्यात यावी, असेही नोटिशीत नमूद केले आहे.

औरंगाबादजवळ भीषण अपघात; रेल्वेखाली चिरडून १६ मजूर ठार, २ जखमी

मजुरांना रुळावर पाहून गाडी थांबवण्याचा प्रयत्न झाला होता पण...

रेल्वेमंत्री गोयल यांनी राजीनामा द्यावा- शिवसेना

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज