अ‍ॅपशहर

रिक्षा अचानक पेटली, ९ जण भाजले

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ गॅस गळती झाल्यानं एका रिक्षाला आग लागून एकाच कुटुंबातील ९ जण भाजल्याची घटना रात्री घडली. या ९ जणांना तातडीनं सायनच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. पेट घेतलेली ही रिक्षा काल रात्री शिवाजीनगरहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जात होती.

Maharashtra Times 26 Sep 2016, 9:50 am
मटा ऑनलाइन वृत्त।मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम auto set on fire in mumbai 9 burnt
रिक्षा अचानक पेटली, ९ जण भाजले


मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ गॅस गळती झाल्यानं एका रिक्षाला आग लागून एकाच कुटुंबातील ९ जण भाजल्याची घटना रात्री घडली. या ९ जणांना तातडीनं सायनच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

पेट घेतलेली ही रिक्षा काल रात्री शिवाजीनगरहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जात होती. टर्मिनसच्या जवळ पोहोचताना या रिक्षानं अचानक पेट घेतला. या आगीमुळे भाजलेल्यांमध्ये ३ महिला आणि ५ मुलांचा समावेश आहे. या ५ मुलांपैकी दोन मुलं केवळ दोन महिन्यांची आहेत हे विशेष.



हे अपघातग्रस्त कुटुंब मुंबईहून कर्नाटकात एका समारंभासाठी जात होतं.

आसन क्षमता ३ असलेल्या या रिक्षात ९ जण बसलेच कसे, असा प्रश्नही या अपघातानंतर विचारला जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज